शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजप गप्प - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:31 IST

बुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी येथे केले.

ठळक मुद्देबुलडाण्यात गुरुवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत चटप यांचा भाजपला टोला

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी येथे केले.गुरूवारी बुलडाणा येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी राम नवले, बार कॉन्सीलचे अध्यक्ष राज देवकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील, सुरेश वानखेड, दामोदर शर्मा, बाबुराव नरोटे, रंजना मार्मडे, नामदेवराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना वामनराव चटप म्हणाले की २८ सप्टेंबर १९५३ राजी नागपूर कररा झाला होता. विदर्भाला त्यावेळी महाराष्ट्रात जनतेची संमती न घेता सामिल केले होते. तेव्हापासून विदर्भावर अन्याय होत आहे. या करारानुसार २३ टक्के नोकर्या वैदर्भीय तरुणांना देणे आवश्यक होते. पंरतू प्रत्यक्षात आठ टक्केच दिल्या गेल्या. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक दिल्या गेल्या. यासह अन्य मुद्द्यांचा वामनराव  चटप यांनी उहापोह केला. सरकाली तिजोरीतील एक लाख कोटी रुपये विदर्भाच्या वाट्याचे असताना  पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी ते पळविले म्हणून विदर्भात शेती सिंचनाचा अनुशेष आहे. केवळ १७ टक्केच शेती ओलितीखाली आली आहे. कोल्पापूरमध्ये ते प्रमाण ९५ टक्के आहे. पुण्यात १00 टक्के आहे. पश्‍चिम महाराष्ट्र हिरवागार तर विदर्भ कोरडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. १८ हजार किमी रस्त्यांचाही अनुशेष आहे. त्याचेही ५0 हजार कोटी रुपये पश्‍चिम महाराष्ट्राने पळवल्याचे ते म्हणाले. प्रत्येक मुद्द्यावर उहापोह करून त्यांनी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नसल्याची भूमिका या पत्रकार परिषदेत मांडली. वीज प्रश्नाचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटपbuldhanaबुलडाणा