शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

५२ वर्षांची परंपरा खंडीत : श्री गजानन महाराज संस्थानची पायदळवारी रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:08 IST

. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे.

ठळक मुद्दे२८ मे रोजी निघणारी श्रींचीपालखी रहित करण्यात आली आहे.पंढरपूरच्या पायी वारीवरही कोरोना या संसर्गजन्य आजाराचे सावट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: जगात सर्वत्र कोरोना विषाणू संक्रमनाचा हाहाकार आहे. अशा प्रसंगी अडचणी लक्षात घेत, श्री गजानन महाराज संस्थान शेगावकडून यावर्षी पालखी सोहळा रहीत करण्यात आला आहे.श्री क्षेत्र पंढरपूर येथे संस्थानची कायम शाखा झाली आहे. तेथे श्रींच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा होवून नित्य पुजा - अर्चा , सोपस्कार व नियमाप्रमाणे कार्यक्रम केल्या जातात. पंढरीनाथाच्या चरणीही नित्य सेवा भक्तीभावाने कायम होत आहे. त्यामुळे अशा प्रसंगी श्री पालखी (श्री पादुका ) पंढरपूरास नेणे उचित ठरणार नाही, त्यामुळे पालखी सोहळा रहीत करण्यात आल्याचे संस्थान कडून सांगण्यात येते. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे. त्यानुसार आषाढी एकादशीच्या वारीचे नियोजन दरवर्षी करण्यात येत असते. श्री गजानन महाराजांच्या पंढरपूरच्या पायी वारीवरही या संसर्गजन्य आजाराचे सावट आहे. त्यामुळे २८ मे रोजी निघणारी श्रींचीपालखी रहित करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत देशभरात कोरोना विषाणूची लागण झाल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे पंढरपूरच्या आषाढीवारी बाबत संपुर्ण महाराष्ट्रातील विविध संस्थांनांच्या पालख्या , दिंड्या व वारकऱ्यांचे वारीचा निर्णय झालेला आहे. त्याअनुषंगाने श्रीगजानन महाराज संस्थान द्वारा पंढरपूर वारी बाबत प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी) 

टॅग्स :ShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरPandharpur Wariपंढरपूर वारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस