शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुलडाणा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्के अधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 10:52 IST

यंदा जिल्ह्यातील ९६ टक्के क्षेत्रावरील पिके ही उत्तम स्थितीत असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

बुलडाणा : गतवर्षीच्या तुलनेत जुन, जुलै महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे. दरम्यान, काही पिकांवर मावा, रस शोषणारी अळी आणि सेयाबीनवर चक्री भुंग्यांचा अवघ्या दोन ते तीन टक्के पिकांवर प्रादुर्भाव झाला आहे; मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यंदा जून, जुलै महिन्यात टप्प्या टप्प्याने पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मशागतीसाठीही वेळ मिळाल्याने पीक चांगले आहे. जिल्ह्यात गतवर्षी जून-जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत यंदा सरासरी ५.४५ टक्के अधिक पाऊस पडला असून, वार्षिक सरासरीच्या तो ५२ टक्के झाला आहे. पाऊस ठरविक खंड देत झाल्याने यंदा जिल्ह्यातील ९६ टक्के क्षेत्रावरील पिके ही उत्तम स्थितीत असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.विशेष म्हणजे यंदा उद्दिष्ठांपेक्षा ३० टक्के मक्याचा पेरा अधिक झाला आहे. तृणधान्याचा पेरा जिल्ह्यात ३५ हजार ५६८ हेक्टरवर झाला आहे. कडधान्याचा पेरा एक लाख सात हजार ४४ हेक्टरवर झाला आहे. यात उडीद पिकाचा पेरा सर्वाधिक आहे. तेलबियामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनला पसंती दिल्या जाते. त्यानुषंगाने तेलबियांच्या उद्दिष्ठांपैकी सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला असून, तीन लाख ६६ हजार ५५८ हेक्टरवर तो झाला आहे. तर कापसाचा पेरा एक लाख ९४ हजार ६४७ हेक्टरवर आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात कपाशीचे पिक जोमदार असून, दोन ते तीन टक्के क्षेत्रारवरील कपाशीचे पीक हे फळधारणेच्या स्थितीत आले असून, अन्य ठिकाणी ते फुलावर आले आहे. खामगाव तालुक्यातील काही भागात गुलाबी बोंड अळी दिसून आली. शेतकºयांनी त्वरित त्याची माहिती कृषी विभागास दिल्यास वेळीच त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यात पीकांची स्थिती जुन, जुलै महिन्यात उत्तम असल्याने जिल्ह्यात आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

पाणी पुरेल का?जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या ३२३ दलघमी पाणीसाठा असून, बुलडाणा जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई विचारात घेवून सरासरी ४० दलघमी पाणी आरक्षीत करण्यात येत असते. ते पाहता वर्तमान पाणी आरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रकल्पामध्ये पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. नऊ पालिका आणि १६९ गावांसाठीप्रामुख्याने पाणी आरक्षीत करावे लागते. सध्या स्थितीत पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

१४ हजार हेक्टर नुकसानजुलै महिन्यात शेगाव, खामगाव तालुक्यातील आठ मंडळात अतिवृष्टी झाल्याने १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. २०० हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली आहे. शेगाव तालुक्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर नुकसान झाले असून, खामगाव तालुक्यात १२४० हेक्टरवर नुकसान झाले. सहा तालुक्यात नुकसान झाले.

टप्प्या टप्प्याने पाऊस पडल्याने पिकांची स्थिती चांगलीजिल्ह्यात यंदा टप्प्या टप्प्याने पाऊस पडल्याने पिकांची स्थिती चांगली आहे. पिकांना आंतरमशागत करण्यासाठीही शेतकºयांना त्यामुळे वेळ मिळला. जिल्ह्यातून जून महिन्यात ११५ टक्के तर जुलै महिन्यात ११० टक्क्यांच्या आसपास पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे. काही ठिकाणी अल्प प्रमाता किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसweatherहवामानAgriculture Sectorशेती क्षेत्रDamधरण