शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:43 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांना अद्यापही गत वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या एक दशकापासून दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांना अद्यापही गत वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम जवळपास १३९ कोटींच्या घरात जाते. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याअनुषंगाने शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ५८६ गावातील दोन लाख २७२ हजार हेक्टर क्षेत्र या पाच तालुक्यात बाधीत झाले होते. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या जवळपास ३१ टक्के पाऊस कमी पडल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यातील ५५ मंडळामधील ८३४ गावांमध्ये दुष्काळ ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. नवीन निकषाच्या आधारावर हा दुष्काळ जाहीर झाला होता. मात्र जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यातील ३८ मंडळामधील ५८६ गावांचीही स्थिती बिकट होती. त्यानुषंगाने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे २७ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत उर्वरित मंडळामध्ये पडलेला पाऊस, पीक कापणी प्रयोगाचा अहवाल आणि उत्पादकतेसंदर्भातील अहवालाचा मॅन्युअली अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यासंदर्भाने सहा नोव्हेंबर २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उर्वरित ३८ मंडळातील ५८६ गावात दुष्काळ जाहीर झाला होता.मात्र प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यातील मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ८३४ गावातील तीन लाख २० हजार ३०८ शेतकºयांना १९५ कोटी २४ लाख ३१ हजार ३५३ रुपयांची मदत देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर झालेल्या उपरोक्त गावातील शेतकºयांना ९८ टक्के मदत वाटप करण्यात आली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात दुष्काळ घोषित झालेल्या भागातही ८९ कोटी २२ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वाटप करणे बाकी आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने अमरावती आयुक्त कार्यालयाकडे अनुषंगीक मागणी केलेली आहे. मात्र अद्यापही रक्कम मिळालेली नाही. तहसिल कार्यालयाकडूनही त्याची मागणी होत आहे. उर्वरित पाच तालुक्यातील ५८६ गावांतील शेतकºयांनाही दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आॅगस्ट २०१९ उजाडले असतानाही मिळालेली नाही. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे २० जुलै रोजीच प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापही रक्कम उपलब्ध झाली नाही. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस असला तरी प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मात्र वाढ झालेली नाही.

पाच तालुक्याील शेतकºयांच्या दुष्काळी मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ८९ कोटी रुपयांचाही प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.-भिकाजी घुगेनिवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी