शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम् सुफलाम् बुलडाणा’ अभियानाला सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:48 IST

खामगाव:  बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने राज्यातील  १७५ तालुक्यातील शेती बांधावरील तसेच गाव तलावातील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, ३ मार्चपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा येथून या मोहिमेस प्रारंभ होईल.

ठळक मुद्दे३ मार्च रोजी बुलडाणा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने राज्यातील  १७५ तालुक्यातील शेती बांधावरील तसेच गाव तलावातील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, ३ मार्चपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा येथून या मोहिमेस प्रारंभ होईल.भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलालजी मुथ्था पुणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जैन संघटना जलक्रांतीसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील गाव तलावांचा गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्यावतीने त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत असून, १६ फेब्रुवारी रोजी नांदुरा येथे जैन समाजाची बैठक झाली. या बैठकीत जैन संघटनेचे बुलडाणा उपजिल्हा समन्वयक  प्रेम झांबड यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  शांतीलालजी मुथ्था  हे स्वत: कंडारी येथील तलावातील गाळ काढण्याच्या उदघाटन साठी येणार असल्याची माहिती दिली.  या बैठकीला बुलडाणा कमिटी सदस्य  अनिल राका, उमेश जैन,  तालुका समितीचे सदस्य शांतीलाल नहार, सुभाष झांबड, आनंद संचेती,  आशीष जैन,  संदीप गादीया, डॉ. राजेंद्र गोठी, स्वप्नील झांबड, तालुका समन्वयक आशीष वानखडे यांची उपस्थिती होती.

कंडारी येथील तलावाची पाहणी!गाळ काढण्यासाठी नांदुरा तालुक्यातील कंडारी येथील तलावाची पाहणी जैन समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी सरपंच विशाल पाटील, बाळकृष्ण पाटील, विष्णू पाटील आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनबुलडाणा जिल्ह्यातील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय परिवहन तथा राज्य महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी उपस्थितीत राहतील.

१२0 जेसीबी, १४ पोकलॅण्ड दाखलजिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यातील नदी, नाले तसेच तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात १२0 जेसीबी आणि १४ पोकलॅण्ड सोबतच तांत्रिक मनुष्यबळ बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा