शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बुलडाणा : बोंडअळीने झालेल्या नुकसानाचा शेतकर्‍यांना मोबदला द्या - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:58 IST

बुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्‍या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देबोगस बियाणे निर्मिती करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्‍या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बोगस बिटी बियांण्यांमुळे हा प्रकार घडला असून,  शेतकर्‍यांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे या कंपन्यांवर कारवाई करत मोबदला म्हणून त्यांच्याकडून व सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू असून, १९ डिसेंबर रोजी शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर खा. प्रतापराव जाधव यांनी मागण्या मांडत पांढर्‍या सोन्याची अर्थात कापसामुळे निर्माण झालेल्या शेतकर्‍यांच्या जीवनातील  काळी बाजू मांडली. यावेळी खा. जाधव म्हणाले की,  बिटी बियाण्यांवर अळीचा हल्ला होऊ नये म्हणून आवश्यक जीन्स त्यात टाकले जातात; मात्र असे असतानाही जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा बोंडअळीच्या हल्ल्याने हंगाम हिरावल्या जात आहे. पाच ते सात  फुटापर्यंत कपाशी वाढली. बोंडांची संख्या नेहमीपेक्षा दीडपट असल्याने उत्पन्नाची आशाही शेतकर्‍यांना होती; मात्र पांढर्‍या सोन्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. १00 क्विंटलच्या आसपास उत्पादन देणार्‍या शेतामधून १0 क्विंटलही कापूस होऊ शकला नाही. बिटी कॉटनचे बियाणे निर्माण करणार्‍या कंपन्यासोबत अँग्रीमेंटही शेतकर्‍यांनी केले होते. तरीही कापसाच्या उत्पादनात म्हणता येईल, असा खास नफा दिसून आलेला नाही. एका अंदाजानुसार ५0 ते ८0 टक्के कापसाच्या पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. कपाशीच्या या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांची नाराजी बियाणे विक्री करणार्‍या आणि त्यासंबधी अँग्रीमेंट करणार्‍या कंपन्यांबाबत आहे. शेतकर्‍यांजवळ बियाणे खरेदी रेकॉर्ड, रिकाम्या बियाण्यांच्या थैल्या व इतर सहायक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सरकारी आर्थिक मदत मिळण्यास त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील आणि खासकरून विदर्भातील गुलाबी बोंडअळीच्या या हल्ल्यापासून बचावासाठी बिटी कॉटन बियाणे उपलब्ध करणारे दोषी कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच या कंपन्यांकडून व राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना मोबदला मदत म्हणून देण्यात यावा, अशी मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाcottonकापूस