शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढले - पंजाबराव डख पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 19:23 IST

Cement concrete roads raise temperature : सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला.

 -   नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद :पूर्वी पाऊस येण्याचे काही ठोकताळे होते.शेतकरी वर्ग त्यानुसार पेरणी करीत असे आणि त्या वेळी शेतकर्‍यांनी अंदाज केल्याप्रमाणे पाऊस बरसत असे.काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली,सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला.त्यामुळे एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ढगफुटीच्या प्रमाणात वाढ असे विसंगत चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी आपले जुने तंत्र वापरावे असे आवाहन हवामानाचे अभ्यासक पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.        श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा येथे हवामानातील बदल व पाऊस पाणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले पाऊस येण्याची काही लक्षणे आहेत.दिवस मावळत असतांना आकाश तांबडे झाले तर 72 तासात पाऊस येतो.गर्मी वाढल्यास बहात्तर तासात पाऊस येण्याची शक्यता असते तसेच चिमण्यांनी धुळीत आंघोळ केल्यास 72 तासात पाऊस येतो.जेव्हा पावसाचे ढग वाहतांना विमानासारखा आवाज येतो तेव्हा पाऊस येणार असे निश्चित समजावे. कावळ्याने आपले घरटे झाडाच्या शेंड्यावर केल्यास समजावे की यावर्षी पावसाळा कमी होणार आहे, झाडाच्या मध्यभागी केल्यास समजावे पावसाळा जास्त होणार आहे.उन्हाळ्यात 15 मे ते 30 मे दरम्यान पाऊस झाल्यास पेरणी योग्य पाऊस वेळेवर होईल असा अंदाज व्यक्त करावा,असे काही ठोकताळे पंजाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

गारपीट होण्याची स्थिती साधारणपणे 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या दरम्यान गारपीट होते.42 हजार 260 गावांपैकी फक्त शंभर गावांमध्ये गारपीट होते.जिथेडोंगराळ भाग आहे व धरण आहे तेथे गारपीट मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता असते.काळ्या कसदार जमिनीत शक्यतोवर गारपीट होत नाही.15 मे ते 30 मे च्या दरम्यान वीज पडण्याचे प्रमाण जास्त असते. साधारणपणे नारळाचे झाड,आंब्याचे झाड, मंदिराचा कळस व जनावरे यावर व वीज पडण्याचे प्रमाण मोठे असते.वीज पडतांना लाकडावर किंवा गवताच्या पेंडी वर उभे राहिल्यास अंगावर वीज पडण्याचा धोका टळतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदweatherहवामानenvironmentपर्यावरण