शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

विदर्भ-मराठवाड्यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चक्का जाम - राजू शेट्टींची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 7:10 PM

१९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली.

ठळक मुद्दे विदर्भात आयोजित पहिल्या सोयाबीन-कापूस परिषदेमध्ये ते बोलत होते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून सोयाबीन व भुईमूगाच्या पिकाचे भाव घसरल्याचे खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

बुलडाणा: विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून, सोयाबीन-कापसाच्या भावासाठी दसऱ्याला शस्त्रपुजन करून दुसऱ्या दिवशी अर्थात १९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली. विदर्भात आयोजित पहिल्या सोयाबीन-कापूस परिषदेमध्ये ते बोलत होते. दरम्यान, दाळवर्गीय शेती माल आणि सात लाख क्विंटल पामतेल आयात केल्याने देशाच्या परकीय गंगाजळीला फटका बसल्याने आर्थिक स्थिती दोलायमान झाल्यानेच डॉलच्या तुलनेत रुपया घसरला आहे.देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मोदी सरकारने दोलायमान केल्यानेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून सोयाबीन व भुईमूगाच्या पिकाचे भाव घसरल्याचे खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये दोन आॅक्टोबर रोजी ही सोयीबन-कापूस परिषद आयोजित केली होती. यावेळी स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, माजी मंत्री सुबोध मोहिते, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिता ढगे, चंद्रशेखर साळुंके, साईनाथ अण्णा, मारोती वर्हाडे, शर्मिला येवले, दामोधर इंगोले यांच्यासह अन्य उपस्थित होते. खा. राजू शेट्टी पुढे म्हणाले की, शेतकरी पीक विमा योजना ही शेतकर्यांचे नाव वापरून शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे. त्यामुळे ही योजना पंतप्रधान कॉर्पाेरेट योजना असून परदेशातून आयात केलेला माल आणि ही कॉर्पाेरेट योजना उद्योजकांच्या भल्यासाठीची योजना आहे. त्यामुळे देशासाठी हे मोदी निर्मित संकट आहे. पुढील काळात सत्ताधार्यांच्या पाठीत लाथ घालून त्यांना दूर ठेवा. विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीन-कापूस परिषदेच्या माध्यमातून आता पश्चिम महाराष्ट्रातील ऊस व दुध आंदोलनाच्या धर्तीवर ही एक निर्णायक लढाई करण्याच्या तयारीत स्वाभीमानी शेतकरी संघटना आली असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून सोयाबीन व कापसाला हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, सोयाबीनसह, बोंडअळीमुळे गेल्या वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करावेत, यासह विविध मागण्याांसाठी सिमोलंघनानंतर शेतकर्यांसाठी विदर्भ-मराठवाड्यात चक्का जाम करून सोयाबीन-कापसाच्या भावासाठीच्या निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले. झेंडे बाजूला सारून शेतकर्यांनी एकजूट दाखवावी-तुपकर पश्चिम विदर्भाप्रमाणेच विदर्भातही शेतकर्यांनी त्यांच्या खांद्यावरील झेंडे बाजूला सारून कापूस-सोयाबीनच्या भावासाठी एकजूट दाखवावी. बुलडाण्याचे पाणी पळविण्याचा पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी घाट घालू नये. ते लोणीकर असतील तर आपण तुपकर आहोत. मुळातच बुलडाणा जिल्ह्याचा विकासदर कमी आहे. त्यात शेतकरी आत्महत्या होत असताना ही बाब योग्य नसल्याचे तुपकर म्हणाले. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगही नाहीत. जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेलेल्या टेक्सटाईल पार्कचे पुढे काय झाले हे ही सत्ताधारी भाजपाने सांगावे, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRaju Shettyराजू शेट्टी