शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

घरंदाज समजणाऱ्यांनी बाळासाहेबांचा विचार संपवला; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By निलेश जोशी | Updated: January 13, 2024 18:58 IST

चिखलीतील शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर टीका

बुलढाणा : आपल्यासारख्यांना घरगडी संबोधून स्वत:ला घरंदाज समजणाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विरोधकांशी हातमिळवणी करीत संपवले. शिवसैनिकांचे खच्चीकरण करीत ज्या काँग्रेसला गाडायची भाषा शिवसेनाप्रमुखांनी केली त्यांच्याच मांडीला मांडी लावत यांनी सत्ता स्थापन केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिखली येथे केली.

चिखली येथील क्रीडा संकुलाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना १३ जानेवारी रोजी ते बोलत होते. यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. संजय शिरसाट, चंद्रकांत पाटील, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, जिल्हा शिवसेनाप्रमुख अेामसिंग राजपूत, ऋषी जाधव, शांताराम दाणे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल काहींनी मुक्ताफळे उधळली. स्वत:ला घरंदाज समजत आपल्याला तुच्छ लेखले; पण त्यांना आजही कळत नाही की, त्यांच्यासोबत असलेले आज आपल्यासोबत आले आहेत. सत्ता असताना आपण पायउतार झालो. तरीही ५० जणांनी आपल्याला पाठिंबा दिला. इतके असतानाही त्यांना अद्याप समजत नाही.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर खरपूस टीका केली. स्वत: घरंदाज म्हणून घेणाऱ्यांनी निवडूक एकासोबत लढवली आणि सत्ता दुसऱ्यासोबत स्थापन करीत आपली अख्खी हयात काँग्रेसविरोधात घालवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार संपवला. घरी बसून सरकार चालविता येत नाही, असा उल्लेख पुस्तकात शरद पवारांनी केला आहे. तरीही तुम्ही त्यांच्यासोबत बसता. आगामी काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले. बाळासाहेबांनी पाहिलेले कलम ३७० हटविण्याचे आणि राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णत्वास नेले. दहा वर्षांत त्यांनी देशाचा चेहरामोहरा बदलला, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

चिरंजीवांसाठी दोन आमदारांचे बळी!

आपल्या चिरंजीवांसाठी दोन-दोन आमदारांचे बळी यांनी घेतले. आपण तसे नाही आणि तसे करणारही नाही. हेलिकॉप्टरमध्ये बसून फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली बरी, असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी बोलताना मारला. शेती करण्याच्या मुद्द्यावरून मध्यंतरी झालेल्या टीकेलाही याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेbuldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना