शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चिखली : थेट सरपंच निवडीत काँग्रेसने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:25 IST

चिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट  निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून,  निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये  काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात  काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीचे निकाल जाहीर  झाल्यानंतर गावोगावच्या नागरिकांचे जथ्थे व विजयी  उमदेवारांनी आमदार राहुल बोंद्रे यांची जनसेवा कार्यालयावर  भेट घेऊन जल्लोष साजरा केला.

ठळक मुद्देतालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचायतींवर दावाकव्हळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट  निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून,  निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये  काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात  काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीचे निकाल जाहीर  झाल्यानंतर गावोगावच्या नागरिकांचे जथ्थे व विजयी  उमदेवारांनी आमदार राहुल बोंद्रे यांची जनसेवा कार्यालयावर  भेट घेऊन जल्लोष साजरा केला. तालुक्यातील पाटोदा, कर तवाडी, आंधई, उंद्री, चंदनपूर, पेनसावंगी, कव्हळा,  मिसाळवाडी, रानअंत्री, बेराळा, गुंजाळा, सातगांव भुसारी,  किन्ही सवडत, वरखेड, भानखेड, मनुबाई व महिमळ या १६  गावाचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार हे काँग्रेस प्रणित  असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले असून, वरील गावातील सर्व  विजयी सरपंच व सदस्यांनी ग्रामस्थांसह जनसेवा कार्यालयावर  येऊन आनंद साजरा केला. दरम्यान, गत काळात केंद्रात व  राज्यात असलेल्या भाजप सरकारकडून सर्वसामान्य जनतेला  वेठीस धरीत त्यांच्यावर लादलेली महागाई व भाववाढ,  निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासत, सुरू  असलेला मनमानी कारभार, नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी,  यासारखे ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करणारे निर्णय, यामुळे  ग्रामीण भागात भाजपाविषयी नाराजीचे वातावरण होते. त्याचाही  परिणाम या निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार  निवडून येण्यात झाल्याचे या निवडणुकीत दिसून आल्याची प्र ितक्रिया काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष कैलास खंदारे व  शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी यांनी दिली आहे. 

कव्हळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्वतालुक्यातील उंद्री आणि कव्हळा या ग्रामपंचायतीमध्ये दीर्घकाळ  भाजपचाच वरचष्मा राहिला आहे; परंतु काँग्रेसकडून उंद्रीमध्ये  भूमीमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांना  पक्षात सामावून घेत आमदार राहुल बोंद्रे यांनी उमेदवारी दिली.   त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला व पहिल्यांदाच थेट  निवडणुकीतून तालुक्यातील मोठय़ा ग्रामपंचायतींपैकी एक  असलेली उंद्री ग्रामपंचायत काँग्रेस ताब्यात आली आहे.  त्याचबरोबर कव्हळा येथेही अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ही  ग्रामपंचायत काँग्रेसने हस्तगत केली असून, ग्रामपंचायत सदस्य  पदाच्या निवडणुकीतही काँग्रेसनेच व्यापक यश संपादन केले  असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.