शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

चौंढी, आलेवाडी, अरकचेरीची प्रकल्पांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:13 IST

Buldhana District News : आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी प्रकल्पाची कामे भूसंपदानाच्या प्रक्रियेतील अडथळ्यामुळे रखडली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने बळीराजा संजीवनी योजनेतंर्गत येत असलेल्या आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी प्रकल्पाची कामे भूसंपदानाच्या प्रक्रियेतील अडथळ्यामुळे रखडली आहेत. संयुक्त मोजणीनंतरही काही शेतकऱ्यांनी जादा मोबदल्याची मागणी केली आहे. त्याचाही फटका ही प्रकल्पाच्या पुर्णत्वास बसत आहे .सुमारे ६७३ कोटी १६ लाख रुपये खर्च या तीनही प्रकल्पांसाठी अपेक्षीत असून यापैकी काही निधी अद्याप अप्राप्त आहे. तीनही लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांद्वारे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकूण क्षमतेच्या जवळपास ६८ हजार हेक्टरवर होणाऱ्या सिंचनामध्ये वाढ होऊन ते ७० हजार हेक्टरवर पोहोचेल. मात्र चौंढी प्रकल्पाच्या घळभरणीच्या प्रक्रियेमध्ये मात्र अडचण येण्याची शक्यता आहे. मालकी हक्कासंदर्भातील काही प्रकरणांमध्ये समस्या आहेत. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणीनंतर फळझाडांची लागवड केलेली आहे. त्यांची मागणी वाढीव मोबदल्याची आहे. त्यामुळेही भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडचणी येत आहे. तिन्ही प्रकल्पांचे भूसंपादनाचे काम जवळपास पूर्णत्वास आलले आहे. मात्र मोजक्या काही अडचणीमुळे त्यात समस्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर भूसंपादनाची प्रकरणे त्वरेने मार्गी लागल्यास २०२३ अखेर या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष सिंचनाचे लाभ मिळण्यास प्रारंभ होईल, असे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे.गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत या प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी येत असलेल्या अडचणीचाही आढावा घेण्यात आला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प