शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सार्वजनिक कंपन्या विकून आरक्षण संपविण्याचे षडयंत्र -भूपेश बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 18:17 IST

Bhupesh Baghel : मोदी सरकारने विक्रीचा सपाटा लावलेले सार्वजनिक उपक्रम वाचवावे लागतील, त्यासाठी आेबीसींचा सर्वंकष लढा उभारावा लागेल,’ असे आवाहन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

शेगाव : ‘सध्या एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने होत आहेत, तर ज्या संस्थांमध्ये आरक्षणातून नोकरी देता येते, त्या संस्थांच केंद्र शासनाकडून विकल्या जात आहेत, त्यामुळे शासकीय संस्थाच शिल्लक राहणार नाहीत तर आरक्षण कुठे मिळेल? केंद्रातील मोदी सरकारने विक्रीचा सपाटा लावलेले सार्वजनिक उपक्रम वाचवावे लागतील, त्यासाठी आेबीसींचा सर्वंकष लढा उभारावा लागेल,’ असे आवाहन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.शेगावात आेबीसी अधिकार संमेलनात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, आमदार राजेश एकडे, आमदार अमित झनक, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार अॅड. नातिकोद्दीन खतिब, हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शाम उमाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

केंद्रातील मोदी सरकार आेबीसींना केवळ मतं देणारी मशीन म्हणून वापरत आहे, त्यासाठी वेळोवेळी वादग्रस्त मुद्दे पुढे केले जात आहेत. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे. केंद्रातील माेदी सरकार केवळ राम नाम जपना, पराया माल, या नीतीने वागत असल्याचेही मुख्यमंत्री बघेल यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसShegaonशेगाव