शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:08 IST

खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

ठळक मुद्देगहू,हरभरा, कांदा पिकाला हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर पंचायत समितीवर भव्य मोर्चा शनिवारी दुपारी काढला. यावेळी ते बोलत होते.  रविकांत तुपकर यांनी बैलगाडी मोर्चाचे नेतृत्व केले. यापुढे सरकारच्या चुकीच्या धोरणावर तुपकर यांनी कडाडून टीका केली. एकीकडे माल्ल्या हजारो कोटींचा डल्ला मारून परदेशात पळून गेला. आता नीरव मोदीने आमच्या बँकावर डाका टाकून तोही फरार झाला. शेतकरी मात्र हजार-दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी सरकारपुढे हात पसरवत आहे. काय चाललंय या देशात, ‘सब का साथ, सबका विकास’ म्हणणार्‍या मोदीने कोणाचा विकास केला? असा सवाल उपस्थित करून देश विकायला काढणार्‍या या सरकारला आता घरी पाठविण्यासाठी शेतकर्‍यांनो सज्ज व्हा, असे आवाहन तुपकर यांनी केले.      बोंडअळीच्या अनुदानाचे काय झाले? सोयाबीनने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कोलमडून पडला. गारपिटीने शेतकर्‍यांचा गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी सरकार आता वीमा कंपन्यांकडे बोट दाखवत आहे. अनेक शेतकर्‍यांना विमा भरता आला नाही. मग अशा शेतकर्‍यांना तुम्ही वार्‍यावर सोडणार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करताना प्रशासन दुजाभाव करीत आहे. गावपुढारी पटवार्‍यांना हाताशी धरून आपल्या जवळच्या लोकांचे पंचनामे करून घेत आहे. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. ही हुकूमशाही वेळीच बंद न झाल्यास व सर्वांना समान न्याय न मिळाल्यास अधिकार्‍यांना झोडपून काढा, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.  या मोर्चामध्ये स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, मोहन पाटील, उज्ज्वल चोपडे, रोषण देशमुख, संतोष दाने, विलास तराळे,  ज्ञानेश्‍वर हागे सहभागी झाले होते. 

तोंड पाहून पंचनामे करू नका!शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा, तोंड पाहून पंचनामे करणे बंद करा व ज्यांचे खरेच नुकसान झाले त्यांना मदत द्या अन्यथा शेतकरी हातात रुम्हणे घेऊन ठोकून काढतील, असा सूचक इशाराही तुपकर यांनी दिला.

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkhamgaonखामगाव