शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:24 AM

गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ...

गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल भावात विकावा लागला. शेतकऱ्यांनी अडचणीत पेरणी उरकली. परंतु सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. या सर्व परिस्थितीचा सामना करून पीक बहरात आले असता निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टी झाल्याने मूग, उडीद या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भात शासनाच्या वतीने या

पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. सोयाबीनच्या झाडावरच शेंगांना कोंब फुटल्याने पिकाची

नासाडी झाली. काही गावातील शेतकऱ्यांना तूटपुंजी मदत मिळाली तर काही भागात अधिकाऱ्यांनी पिकाचे नुकसान होऊनसुद्धा चुकीचा अहवाल दिल्यामुळे मदतच मिळाली नाही. पीकविम्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला नाही. नापिकीमुळे बँकेचे काढलेले कर्ज शेतकरी भरू शकले नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना बँका कर्ज वाटप करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, यावर्षी पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गतवर्षीचे असलेले बँकेचे कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने यावर्षी पीक कर्जवाटप करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार लोणार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.