शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ग्राम विकासामुळेच देशाचा विकास - प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:09 IST

नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपला देश ग्रामीण भागांचा आहे. जोपर्यंत ग्रामविकास साधल्या जाणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होवू शकत नाही. त्यामुळे कामांचा दर्जा राखून नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १३ जानेवारी रोजी निवनिर्वाचित जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या पदग्रहन सभारंभात ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनिषाताई पवार, आ. संजय गायकवाड, जि. प. सभापती दिनकरराव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृ.उ.बा.समिती सभापती जालिंधर बुधवत, माजी जि. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, लक्ष्मणराव घुमरे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, मंगलताई रायपुरे, मनोज कायंदे, गट नेते आशिष रहाटे, माजी सभापती रियाज खॉन पठाण, जि. प. सदस्य शिल्पाताई शिंपणे यांचेसह जि. प. सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. खा. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेला तुटपूंजा निधी मिळतो. त्यातुन केलेल्या कामांचा दर्जा राखल्या जात नाही. रस्ते, नळयोजना, दवाखाने, शाळा इमारती याबाबत लोकांची मत जाणुन घेवुन काम करा कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. नव्या पदाधिकाºयांनी जलदगतीने ग्रामविकास साधण्यावर जोर द्यावा. यासाठी केंद्रीय ग्रामविकास समितीचा अध्यक्ष या नात्याने सकारात्मक स्वरुपात पाठीशी राहणार असल्याची ग्वाही खा. प्रतापराव जाधव यांनी दिली. महिला घर, कुटुंब चांगले सांभाळतात याच महिला जिल्हाही चांगला सांभळतील, असेही खा. प्रतापराव जाधव म्हणाले. प्रास्तविक शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधव