शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

युतीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुबळी : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:55 IST

खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्थानिक गांधी चौक येथे आयोजित जाहिर सभेत त्यांनी युती शासनाचा खरपूस समाचार घेतला.  सभेसाठी आ.रमेश बंग, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर, श्यामबाबु उमाळकर, तब्बसुम हुसेन, गणेश माने, तेजेंद्रसिंग चौहान, दयाराम वानखडे, अनिल नावंदर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले, राज्यात फडणवीसांचे नव्हे तर फसणविसांचे सरकार आहे. या सरकारने लागू केलेले सारे कायदे अभ्यासपूर्ण नाहीत. केवळ नावाला योजना राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. जीएसटीचा कायदा केंद्रात मनमोहनसिंग यांनी आणला. त्याची अंमलबजावणी भाजपा सरकारला करता आली नाही. गावागावात व्यावसायीकांनी व्यवसाय सुरु न करता आपल्या व्यवसायाचे प्रमाण कमी केले. व्हिडीओ डाक्यूमेंट्रीच्या सहाय्याने त्यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडवणीस सरकारवर टिका केली. पुन्हा भाजप-सेनेचे सरकार आल्यास राज्याचे तसेच देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती व्यक्त करीत त्यांनी आघाडीच्या उमेदवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले.  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्यासह आदि काँगे्रस - राष्ट्रवादी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

खासदारांनी जमवली माया : शिंगणे खासदारांच्या अंगाला मसाल्याचा वास येत असून मसाला व्यावसायिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचंडमाया जमविली असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव येथील सभेत केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस