शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वर्षभरात बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करू - शांतिलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:16 IST

सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.

ठळक मुद्देसुलतानपूरमध्ये नियोजनाबाबत झाली बैठक मोठय़ा संख्येने होती शे तकर्‍यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.स्थानिक वेदांत आश्रमात २५ फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांसाठी आयोजित  सभेत ते बोलत होते. दरम्यान, आगामी सहा महिने हे काम चालणार  असून, यामुळे बुलडाणा जिल्ह्याला एक टीएमसी पाणीसाठा निर्माण  होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे  यांनीदेखील या शेतकरी हिताच्या उपक्रमासाठी शासकीय सुट्यांचा  विचार न करता सर्वतोपरी महसूल प्रशासनाकडून त्यांच्या अखत्यारी तील  अधिकाराचा वापर करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.  कार्यक्रमाला जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, जयचंद भाटिया,  बाफना, भिकमचंद रेदासनी, तुषार बेदमुथा, मयूर गेल्डा, नीलेश नाहटा,  कृषी अधिकारी दांडगे, भैयासाहेब पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्यप ती दिलीप वाघ, पंचायत समितीचे गटनेते डॉ. हेमराज लाहोटी, पंचायत  समिती सदस्यपती गजानन भोकरे, बाजार समितीचे शिवपाटील  तेजनकर, कांता पाटील, वामनराव झोरे, शिवप्रसाद सारडा, विजय  खोलगडे, दत्तात्रय शेवाळे, मधुकर जैन, ग्रामविकास अधिकारी मो तीराम डव्हळे, सतीश बोराळकर, मोहन जैन यांच्यासह गाव परिसरा तील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या अभियानाबाबत सक्रियपणे  सहभागी होण्याचे ग्रामीण भागातील नागरिक सांगत आहेत.

खासगी टँकरने पाणी पुरवठासुलतानपुरात जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५  व्या, १६ व्या दिवशी अवघे २0 मिनिटे ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा  केला जातो, अशी खंत ग्रामस्थांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. येथून  हाकेच्या अंतरावर बोराखेडी तलाव असला, तरी सुलतानपूर मात्र  तहानलेले असून, खासगी टँकरने पाणी विक्री तेजीत आहे. त्यामुळे  शासन व प्रशासनाप्रती गावकर्‍यांमध्ये संताप आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन