शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

विषाची बाटली घेऊन शेतकऱ्याची वन कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:21 AM

चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारातील शेतकरी सध्या रोही आणि हरणांमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या शेतातील पीक हे वन्यप्राणी नष्ट करीत आहे. ...

चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारातील शेतकरी सध्या रोही आणि हरणांमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या शेतातील पीक हे वन्यप्राणी नष्ट करीत आहे. त्यातच अंचरवाडी येथील शेतकरी तथा उपसरपंच सुनील परिहार यांच्या मालकीच्या १० एकर शेतात असलेले पीक रोही या वन्यप्राण्यांनी नष्ट केले. या संदर्भात त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करूनही त्याचा पंचनामा वन विभागाने केला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने चक्क विषाची बाटली घेऊन बुलडाणा वनपरिक्षेत्र कार्यालय गाठत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा अनर्थ टाळला. सोबतच वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांनी या शेतकऱ्याची समजूत घालून त्याचे समाधान केले.

दुसरीकडे, या घटनेचे गांभीर्य पाहता बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी डुकरे, प्रभाकर लोखंडे यांनीही वेळीच या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यास रोखले. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांनी त्वरित शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. सोबतच वन कर्मचाऱ्यांना पंचनाम्याकामी त्वरित रवाना गेल्यामुळे हे प्रकरण थोडक्यात निवळले. या संदर्भात पोलीस प्रशासनाची त्यांच्या स्तरावरील कारवाई सुरू आहे.