शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकर्‍यांचा चार तास ठिय्या; बोंडअळीची केली होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:43 IST

राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याघरासमोर शेतकर्‍यांनी बोंडअळीची होळी केली.

ठळक मुद्देप्रती हेक्टरी १ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याघरासमोर शेतकर्‍यांनी बोंडअळीची होळी केली. जोपर्यंत कृषीमंत्री भेटत नाही तोपर्यत उठणार नाही अशी भूमिका घेत तब्बत चार तास शेतकर्‍यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. संपूर्ण महाराष्ट्रात कपाशीवरील बोंडअळीने शेतकर्‍यांची उभी पिके उद्धस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधी सोयाबीन गेले अन आता कापूस शेतकर्‍यांना काय करावे काही सुचेनासे झाले आहे. शेतकर्‍यांनी आत्मदहनासारखे निवेदने देवूनही सरकारला जाग आली नाही. कापूस कायद्याअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांकडून भरून घेत असलेल्या नमुना जी व नमुना एच, नमुना आय मधील जाचक अटी शिथिल करून तत्काळ सरसकट पंचनामे करणे आवश्यक आहे. परंतू शासनाने यामध्ये केवळ वेळकाढू धोरण अवलंबल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. सावकार व बँकांचे कर्जवसूलीसाठी सक्तीचे तगादे सुरु झाले आहे. अर्थसंकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकाकडून मदतीचा हात मागण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खामगावात कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी मंत्री खामगावात नसल्याने त्यांची भेट होवू शकली नाही. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकर्‍यांनी जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत न उठण्याचा निर्णय घेतला. तब्बत पाच तास शेतकरी रस्त्यातच ठिय्या देवून बसून होते. शेवटी एसडीओ व तहसिलदार यांनी धाव घेत भूमिका समजून घेवून निवेदन स्विकारले. 

सरकारकडून शेतकरी बेदखल औरंगाबाद येथे २४ नोव्हेंंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनासारखे आंदोलन करुनही शासन कोणतीही दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार शेतकºयांच्या मरणावर उठले की काय ? असा सवाल संतप्त शेतकºयांनी व्यक्त केला. 

लोकमतने वेधले होते लक्षबोंडअळीच्या प्रार्दुभावाने शेतकरी संकटात या आशयाचे वृत्त लोकमतने २८ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित करून या विषयाकडे लक्ष वेधले होते हे विशेष. बोंडअळीच्या नुकसानीवर प्रकाश टाकल्याबद्दल शेतकºयांनी लोकमतचे आभार मानले.

हेक्टरी १ लाख अनुदान मिळावेझालेल्या नुकसान भरपाईबाबत आम्ही न्याय मागायला आलो. पण आमच्यासोबत कृषीमंत्री बोलायलाही तयार नाही. शेतकºयांसोबत सरकारची भूमिका असंवेदनशिल आहे.  बोंडअळीच्या नुकसानभरपाईपोटी सरसकट पंचनामे करून १ लाखाचे शेंद्री बोंडअळी अनुदान मिळावे. - संतोष पाटील जाधव, (शेतकरी नेते तथा अर्थ व बांधकाम सभापती), जि.प.औरंगाबाद. 

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरagitationआंदोलन