शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शेतकरी करत आहे रब्बी हंगामाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:02 IST

धाड : अखेरच्या परतीच्या पावसाने खरीपाचा मळणी हंगामाची दैना केली. मात्र नदी नाले भरून वाहिल्याने प्रकल्पांना पुरेसे पाणी आले, यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाच्या पिकांची झडती अल्प प्रमाणात आली, त्यात शासनाने निर्धारीत केलेल्या हमीदरापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाल्याने उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसला नाही. अशा परिस्थितीत बुलडाणा तालुक्यात रब्बी ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने प्रकल्पांना पाणी

धाड : अखेरच्या परतीच्या पावसाने खरीपाचा मळणी हंगामाची दैना केली. मात्र नदी नाले भरून वाहिल्याने प्रकल्पांना पुरेसे पाणी आले, यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाच्या पिकांची झडती अल्प प्रमाणात आली, त्यात शासनाने निर्धारीत केलेल्या हमीदरापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाल्याने उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसला नाही. अशा परिस्थितीत बुलडाणा तालुक्यात रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करत आहे. कमी प्रमाणात पाऊसमान राहिल्याने रब्बी हंगामात हरबरा पेरणी मोठ्या प्रमाणात होणार असे चित्र आहे, या ठिकाणी विराट, डॉलर, जॅकी, यासारखे हरबरा वाण मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. करडी, बोदेगाव, मासरूळ, ढालसावंगी व शेकापूर या धरणांना समाधानकारक जलसाठा झाल्याने हरबरा पिकासह मका, गहू या पिकांची पेरणीची जय्यत तयारी शेतकरी करताना दिसत आहे. मका, गहू पिकांना लागणारी मेहनत व पाणी भरणा हा हरबरा पिकासह जास्त असून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात कमी खर्च व उत्पादन जास्त तसेच दर चांगले असे हरबरा पिकाची पेरणीस प्रारंभ झाला आहे. दिवाळी सणापूर्वी सोयाबीन, मका पिकास असणारे अल्प दर, शेतकºयांना नुकसानदेय ठरले, सणासुदीचे काळात हाती पैसा नसल्याने दिवाळी सणावर विरजन पडले. त्यात रब्बीची तयारी, वेळही कमी अशा अवस्थेत शेतकºयांनी शेतशिवारात दिवाळी साजरी केली. नगदी पिक म्हणून असणारे मका पिकास पाणी भरणा करण्यासाठी आवश्यक विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने भारनियमनाचा परिणाम या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. वारंवार होणारी खंडीत विज, मजुरांची टंचाई यामुळे सरळ सोपे हरबरा पेरणीवर शेतकºयांचा कल आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीचे पैसे दिवाळीपुर्वी शेतकºयांचे खात्यात न पडल्याने त्यांना नव्याने पिककर्ज अजूनही मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. रब्बी हंगामाचे येणारे उत्पादन शेतकºयांना कसे मिळते यावर शेतीचा व्यवसाय ठरलेला असेल. (वार्ताहर)

टॅग्स :agricultureशेती