शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

चिखली-खामगाव महामार्गाच्या कडेला शेतकर्‍यांनी पुकारले बेमुदत उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:54 IST

चिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. 

ठळक मुद्देसंपादित जमिनीचा मोबदल्यासाठी दहिगाववासियांनी सुरू केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. खामगाव ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही महिन्यांपासून युद्धस्तरावर  सुरू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत २४ मीटर रस्ते तयार करण्यात येत असताना यामध्ये रस्त्याच्या कडेवरील शेतकर्‍यांच्या जमिनीचा ताबा कोणत्याही अधिग्रहणाशिवाय परस्पर घेतला जात आहे, तसेच नियोजित २४ मीटर रुंदीपेक्षा जास्त  रुंदीचे मोजमाप करून जमीन ताब्यात घेतली असल्याचा आरोप दहिगाव येथील शेतकर्‍यांनी केला असून, याबाबत १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन याबाबत तातडीने न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. तसेच रस्ता रुंदीकरणांतर्गत होणार्‍या कामामुळे व वाहनांनासाठी तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यामुळे उडणारी धूळ आजूबाजूच्या शेतातील हरभरा, गहू, वाल, यासारख्या पिकाचे नुकसान करीत आहे. सदर झालेल्या नुकसानाची मोका पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीसुद्धा शेतकर्‍यांनी केली असून, या मागणीची दखल न घेतल्याने दहिगाव येथील बळीराम नारायण खरपास, भास्कर मोतीराम खरपास, दिलीप देवलाल बेदकर यांच्यासह संतोष रसाळ, दिलीप  खरपास, विजय होगे यांनी २६ जानेवारीपासून रस्त्याच्या कडेला आमरण उपोषण चालविले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून, प्रशासनाने शेतकर्‍यांच्या उपोषणाची दाखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानीचे नितीन राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाकोडे, तालुकाध्यक्ष शेख मुखतर, अमोल तेलांगरे, भागवत म्हस्के रामेश्‍वर परिहार, दीपक  धनवे, राम अंभोरे यांनी दिला आहे, तर अन्यायकारकरीत्या शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावून शासन शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असेल, तर शेतकर्‍यांना न्याय मिळविण्यासाठी शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका प.स. सदस्य उषा उद्धव थुट्टे यांनी जाहीर केली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावchikhali roadचिखली रोडFarmerशेतकरीagitationआंदोलन