शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:43 IST

Farmers Hunger Strike ११ किलोमीटरपर्यंत पाईपलाईनने पाणी नेण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पेनटाकळी प्रकल्पात उपोषणाला बसले आहेत.

ठळक मुद्देपाणी सोडले तर नुकसान, नाही सोडले तर पिके वाळतात.त्यामुळे प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळपासून पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. पाणी सोडले, तरीही नुकसान होते, आणि पाणी नाही सोडले तर समोरच्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

मेहकर तालुक्यात असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे हजारो हेक्‍टर सिंचन केले जाते. मात्र या कालव्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने कालवा पाझरुन लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाझरत असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती खराब होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटरपर्यंत पाईपलाईनने पाणी नेण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पेनटाकळी प्रकल्पात उपोषणाला बसले आहेत. शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना भेट दिली. या शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी जाणून घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार यांनी जलसंधारण मंत्री यांना भ्रमणध्वनीद्वारे परिस्थितीची माहिती दिली. यासोबतच सर्व परिस्थितीचा अहवाल तयार करून स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी