शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

फुलकोबी’ उत्पादनातून सावरतोय शेती व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:38 IST

खामगाव : खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देएक वेगळी वाट धुंडाळत शेतकरी आता फुलकोबी पिकविण्याकडे वळत आहेत.अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.यामुळे तोट्याचा होत चाललेला शेती व्यवसाय सावरण्यास बळ मिळत आहे. 

- देवेंद्र ठाकरेखामगाव : कोरडवाहू  तर कोरडवाहूच... पण ज्यांच्याकडे सिंचनाची थोडीबहूत सोय आहे, अशा शेतकºयांनाही शेती  परवडेनासी झाली आहे.  आपल्याकडे बागायतदार शेतकरी ज्या पिकाकडे उत्पन्नाची हमी देणारे पिक म्हणून पाहतात, ती कपाशी सुध्दा गेल्या काही वर्षांपासून  दगा देत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.कोरडवाहू शेती गेल्या अनेक वर्षांपासून पिकेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस साथ सोडत चाललेला निसर्ग अन् त्यातून अपुरा तसेच लहरी स्वरूपाचा पडणारा पाऊस यामुळे कोरडवाहू शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी थोडी का होईना सिंचनाची व्यवस्था करून घेतली आहे. सिंचनाची व्यवस्था झाली, तरी यामाध्यमातून पारंपारिक कपाशीचे पिक घेण्याकडेच शेतकºयांचा कल राहीला आहे. परंतु अलीकडे रोगराईने पिकाची होत चाललेली वाताहत पाहता, कपाशी सुध्दा शेतकºयांची निराश करत आहे. त्यातच गेल्या वर्षी बोंडअळी आली अन् कपाशीाबाबत शेतकरी अधिकच सावध झाले. यातूनच एक वेगळी वाट धुंडाळत शेतकरी आता फुलकोबी पिकविण्याकडे वळत आहेत. खामगाव तालुक्यात साधारणपणे अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.  परंतु भाजीपाल्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अलीकडे वांगे, टमाटे या पिकांसोबतच फुलकोबीची गोडी लागली आहे.  हे पिक शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न मिळवून देणारे ठरत असून यामुळे तोट्याचा होत चाललेला शेती व्यवसाय सावरण्यास बळ मिळत आहे. 

एकरी लाखाचे उत्पन्न मिळवून देणारे पिकआपल्याकडे दोन ‘सिझन’ मध्ये फुलकोबीचे पिक घेतल्या जाते. पावसाळ्यात सुमारे ६० ते ६५ क्विंटल कोबीचे उत्पन्न एक एकर शेतीत होते. हिवाळ्यात हेच उत्पन्न १२५ ते १५० क्विंटलवर पोहचते. दोन्ही सिझन मिळून १ लाख ५० हजार  रूपयांचे उत्पन्न होते. यातून खर्च वजा जाता १ लाख रूपये निव्वळ नफा मिळतो, असे शेतकºयांचे म्हणने आहे.

‘कोबी’लाही सतावतो ‘खोडकीडा’इतर पिकांप्रमाणेच फुलकोबी पिकावरही रोगराई येतेच. त्यात पावसाळ्यात खोडकिडा जास्तच त्रासदायक ठरतो. यावर उपाय म्हणून बुरशी नाशक औषधाचा वापर शेतकरी करतात. परंतु उत्पन्नासाठी कोबी चांगला पर्याय असल्याचे अनेकांचे म्हणने आहे.

फुलकोबी शेतीतून चांगले उत्पन्न मिळते.  तशी याआधीही कोबीची लागवड होतीच,  मात्र सध्या इतर पिके दगा देत असल्याने कोबीचे क्षेत्र वाढविले आहे.गजानन चोपडे,शेतकरी घाटपुरी

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी