शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर; पावसाची प्रतिक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:40 IST

खामगाव :  मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली.  यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्दे मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली. आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलिकडे शेतकºयांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.

- देवेंद्र ठाकरे खामगाव :  मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली.  यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. एकीकडे मशीगतीची सर्व कामे पुर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतिक्षा कायमच आहे.२५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली. अनेकठिकाणी मुसळधार  स्वरूपाचा पाऊस पडला. मृग नक्षत्राची सुरूवात होईपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातही पावसाचे आगमन झाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती.  शेतकºयांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांनाच अचानक पावसाने दडी मारली. यानंतर आज येईल, उद्या येईल असे करता-करता तब्बल आठ ते दहा दिवस उलटले. तुर्तास  आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलिकडे शेतकºयांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.

 बियाणे, खतांच्या खरेदीतून फटकामृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. यावर्षी लवकर पेरणी करायची या आशेने अनेक शेतकºयांनी बियाणे, खताची खरेदी केली. सगळीकडे पावसाचे वातावरण असल्याने बियाणे विक्रीच्या दुकानांवर शेतकºयांनी गर्दी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता विक्रेत्यांनीही थोड्या फार फरकाने जादा दर आकारत पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला. पावसाचे वातावरण पाहून शेतकºयांनाही घासघिस न करता, बियाणे व खत खरेदी केली. यातून कमी-अधिक प्रमाणात अनेक शेतकºयांना जादा पैसे मोजावे लागले.

 पुर्णेच्या पुरानेही बळावल्या होत्या आशामध्यंतरी पुर्णा नदीला पूर आला होता. आपल्याकडे पाऊस पडला नसतांनाही मध्यरात्री आलेल्या या पूराबद्दल पहाटे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पुर्णेला आलेला पूर हा अकोला जिल्हा तसेच इतर ठिकाणी पडलेल्या पावसामुळे आला, हे नंतर सगळ्यांना कळले. परंतु अकोला जिल्ह्यात चांगला  पाऊस झाला याचा अर्थ आपल्याकडेही एकदोन दिवसात दमदार पाऊस होईल अशी आशा साºयांनाच लागली होती. अर्थात या आशेवरही तुर्तास पाणि फेरल्या गेले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावmonsoon 2018मान्सून 2018Farmerशेतकरी