शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अखेर राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 12:15 IST

Reconstruction of Raheri Bridge येत्या आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  भारत माला योजनेतंर्गत समाविष्ट असलेल्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय मार्गावरील सिंदखेडराजा तालुक्यात येत असलेल्या व खस्ता हालत झालेल्या ऐतिहासिक राहेरी पुलाच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व अैाषध प्रशासनमंत्री यांनी मुंबईत घेतलेल्या एका बैठकीत या पुलाच्या उभारणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.        गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पुलाचे बांधकाम रखडलेले होते. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एका दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी राहेरी पुलाचे आर.  के. गुप्ता आणि अनुप सूर्यवंशी यांनी संरचनात्मक ऑडिट करत धोकादायक बनलेल्या या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे सुचविले होते. तसेच पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पुनर्बांधणी करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या पुलाच्या बांधकामाचा प्रश्न रखडला होता.त्यातच नागपूर-मुंबई हा मार्ग दर्जोन्नत होवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ सी झाला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अैारंगाबाद विभागातंर्गत हा रस्ता आला आहे. या रस्त्यावरच खडकपूर्णा नदीवर राहेरी गावानजीक  हा पूल आहे. त्याची झालेली दुरवस्था व धोकादायक स्थिती पाहता त्याचे तातडीने पुनर्निर्माण करणे काळाची गरज बनली होती. त्यानुषंगाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीस पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या पुलाच्या पुनर्निर्माणास मान्यता देण्यात आली आहे. 

सहा कोटींचा खर्च अपेक्षितविशेष दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत या पुलासाठी  ६ मार्च २०१९ रोजी या पुलासाठी ९ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, या पुलाच्या कामासोबतच  राहेरी येथे वळणमार्गही प्रस्तावित असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने वळणमार्गासाठी ६ कोटी २१ लाख रुपये तर पुलाच्या सुपल स्ट्रक्चरसाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

४१ किमीचा फेरा वाचेलहा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर अैारंगाबाद तथा मेहकरकडून येणाऱ्या वाहनांचा तब्बल ४१ किमींचा फेरा वाचणार आहे. सोबतच सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील व्यावसायिक व सामान्य नागरिक यांचे आर्थिक नुकसान टळून या मार्गावर रोजागारनिर्मितीस अधिक चालना मिळणार आहे. त्यानुषंगाने पाठपुरावा करून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन वर्षांपासून रखडलेले हे काम मार्गी लावले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे