शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सण-उत्सवात फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:06 IST

गणेशोत्सवामध्ये फळ व फुलांची मागणी वाढते; त्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवात १२ सप्टेंबरपासून विविध फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देएक किलो फुलांसाठी लागणारे पैसे आता एक पाव फुलासाठी मोजावे लागत आहेत. शेवंती मागील आठवड्यात ४० ते ५० रुपये प्रतिकिलो मिळत होती, आता त्यासाठी १०० ते १५० रुपये लागणार आहेत. लिली बंडल १५ ते २० रुपये असून आता ३० ते ४० रुपये मोजावे लागणार आहेत. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: देशभरामध्ये निर्माण झालेल्या इंधन दरवाढीच्या विघ्नात आता फळ व फुलेही माघे राहिली नाहीत. गणेशोत्सवामध्ये फळ व फुलांची मागणी वाढते; त्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवात १२ सप्टेंबरपासून विविध फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ झाली आहे. २०० ते २५० रुपये शेकडा मिळणारा गुलाब आता ५०० रुपयावर पोहचल्याने फुलातूनही महागाईचा सुगंध येत आहे. महागाईच्या विघ्नाने भारत बंदला दोन दिवस होत नाही तोच सण उत्सवामध्ये आवश्यक असलेल्या विविध वस्तुंचे भाव वधारल्याचे चित्र दिसून येत आहे. सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढीचे कारण पुढे करीत अनेक वस्तुंचे भाव वाढविण्यात आले आहेत.  विघ्नहर्ता गणेशाचे आगमन १३ सप्टेंबरला होत असून १५ सप्टेंबरला घरोघरी गौरी विराजमान होत आहेत. सण, उत्सावाच्या पुजेमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या फुलांचे भाव तेजीत आहे. मागील आठवड्यात मिळणाºया एक किलो फुलांसाठी लागणारे पैसे आता एक पाव फुलासाठी मोजावे लागत आहेत. १० व ११ सप्टेंबरला फुलांच्या भावामध्ये मोठी चढ-उतार झाल्याचे दिसून येते. मंगळवारपर्यंत मिळणाºया फुलांचे प्रतिकिलोचे दर बुधवारपासून दुप्पटीने वाढले आहेत. पिवळी शेवंती मागील आठवड्यात ४० ते ५० रुपये प्रतिकिलो मिळत होती, आता त्यासाठी १०० ते १५० रुपये लागणार आहेत. पांढरी शेवंती ६० ते ७० रुपये होती त्याचे भाव १५० ते २०० रुपये झाले आहेत. निशिगंध १००  रुपयांवरून ३५० रुपयांवर पोहचला आहे. गुलाब २०० ते २५० रुपये शेकडा असून आता ४५० ते ५०० रुपये भाव झाले आहेत. झेंडु प्रतिकिलो १० ते १२ रुपये होता, आता ६० ते ७० रुपये किलो आहे. आस्टर नावाचे फुल ६० ते ७० रुपये होते, आता १५० ते २०० रुपये आहे. लिली बंडल १५ ते २० रुपये असून आता ३० ते ४० रुपये मोजावे लागणार आहेत. 

वºहाडात पश्चिम महाराष्ट्रातील फुलेपश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम या भागात फुल शेती करणाºयांचे प्रमाण कमी आहे. झेंडू वगळता इतर फुले बोटावर मोजण्या इतकेच सापडतात. पश्चिम महाराष्ट्रातून वºहाडात फुलांची आवक होत आहे. सध्या अहमदनगर, पुणे आणि जळगाव येथूनही वेगवेगळ्या फुलांची आवक बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यात होत आहे. 

फळांचाही गोडवा महागलागणेश उत्सवामध्ये फळांना महत्व असते. परंतू फळांचे भाव प्रति किलो २० ते ३० रुपयांनी वाढल्याने भाविकांसाठी फळांचाही गोडवा महागल्याचे दिसून येत आहे. सध्या सपरचंद १०० ते १५० रुपये, डाळींब ६० ते ८० रुपये, केळी ३० रुपये असल्याची माहिती फळ विक्रेते चंद्रभान उबाळे यांनी दिली आहे. सण उत्सवाच्यातोंडावर फुलांच्या दरात वाढ झाली आहे. गौरी पुजनाला व समोर येणाºया सण उत्सवामध्ये अजुनही भाव वाढण्याची शक्यता आहे. -राजेंद्र ठेंग,फुल विक्रेते, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarketबाजार