शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

सातपुड्यात यशस्वी होतोय अद्रक शेतीचा प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:20 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात तसे अद्रक उत्पादन घेणाऱ्यांची संख्या फार नाही. सामान्य शेतकºयांना न झेपावणारा उत्पादन खर्च, पाण्याची कमरता व अद्रकासाठी उपयुक्त जमिन अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. परंतु तरीही काही शेतकरी त्यांच्या शेतात नवनविन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करतात. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे १०० एकरावर अद्रक लागवड केली जाते. घाटावर देऊळगावराजा व घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात हे प्रमाण जास्त आहे. अद्रक हे जास्त कालावधीचे पिक असल्याने व उत्पादन खर्च अधिक असल्याने याकडे शेतकºयांचा कल कमी असल्याचे दिसून येते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्रक शेतीत सातत्य टिकवून ठेवले त्यांच्यासाठी सध्याचा काळ म्हणजे ‘सोन्याचे दिवस’ असेच चित्र आहे. सध्या ठोक बाजारात अद्रकाचे भाव ५० ते ६० हजार रूपये क्विंटलवर येऊन पोहचेले आहेत. त्यामुळे अद्रक उत्पादनातून शेतकºयांची घडी सावरताना दिसतेय. सध्या अद्रक शेतीतून एकरी १२५ ते १५० क्विंटल उत्पादन होत आहे. सध्याचे भाव पाहता एकरी ७  ते ८ लाख रूपयांचे अद्रक शेतकरी घेत आहेत. उत्पादन खर्च एकरी १ ते दीड लाख रूपयांच्या घरात आहे. त्यामुळे सध्या शेतकºयांना साधारपणपणे ५ ते ७ लाख रूपये निव्वळ नफा उरत असल्याचे दिसून येते. अद्रक विक्री करण्याकरीता बुलडाणा तसेच अकोला येथेही मोठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी जळगाव खान्देश येथे अद्रकाची विक्री करतात.

मालाची आवक घटल्याने वाढले भाव!महाराष्ट्रात केरळमधूनही अद्रक मोठ्या प्रमाणावर येते. परंतु सरत्या वर्षात केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्रक शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विदर्भात पावसाळाच झाला नसल्याने येथीलही उत्पादन घटले. परिणामी मागील वर्षी २ ते ३ हजार रूपये प्रतिक्विंटल असलेले  भाव वाढत जावून सध्या ५० ते ६० हजार रूपयांवर जावून पोहचले आहेत. किरकोळ बाजारात तर २०० रूपये किलोने ग्राहकांना अद्रक खरेदी करावे लागत आहे.

पिकासाठी लागतो सर्वाधिक कालावधी!अद्रक शेती न करण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे या पिकासाठी १० ते ११ महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे साधारणपणे एक वर्षच यात निघून जाते. शेवटी योग्य भाव मिळाला नाही, तर केवळ उत्पादनखर्चच निघतो. परंतु अशाही परिस्थीतीत सातत्य टिकवून ठेवणाºया शेतकºयांसाठी २०१९ हे वर्ष आशेचा किरण घेवून आले आहे.

 

गेल्या चार ते पाच वर्षांपासून अद्रक शेती करीत आहे. दरवर्षीच चांगले भाव राहतात, असे नाही. परंतु यावर्षी मात्र भावात तेजी असल्यामुळे  अद्रक उत्पादनात सातत्य ठेवल्याचे समाधान वाटते.देविदास वानखडे, अद्रक उत्पादक शेतकरीलहूगाव (भगतपुरा) ता.संग्रामपूर

 

अद्रक उत्पादनासाठी भेगा न पडणारी व गाळाची जमिन आवश्यक आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी जमिन आहे. परंतु  अद्रक उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी नाही. यावर्षी भावात तेजी असल्याने नवनविन प्रयोग करू पाहणाºया शेतकºयांसमोर आशेचा किरण निर्माण झाला आहे.डॉ.अनिल गाभणेशास्त्रज्ञ,  कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी