शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

शासकीय परिसरात अतिक्रमण!

By admin | Published: June 15, 2017 12:14 AM

प्रशासनाचे दुर्लक्ष : दीड वर्षानंतर शहरातील परिस्थिती ‘जैसे थे’!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील बाजाराला जागा अपुरी पडत असून, आठवडी बाजार प्रमुख रस्त्यांसह परिसरातील शासकीय कार्यालयाची जागा व थेट मुख्य दरवाजापर्यंत लघू व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. शहरातील अतिक्रमण काढून आता दीड वर्षांचा काळ लोटल्यानंतर आज शहरात मुख्य मार्गावर अतिक्रमणाने पुन्हा डोके वर काढलेले दिसत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान नगरपालिकेकडून शहरातील मुख्य मार्गावरील सर्व अतिक्रमण हटविण्यात आले होते. यात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यानंतर प्रशासनाकडून या लघू व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्थाही करून देण्यात आली; मात्र आज शहरातील अतिक्रमणाची परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे आता बाजाराची जागा कमी पडू लागल्याने स्टेट बँक चौक ते मेन रोड, मलकापूर रोड, सिनेमा टॉकीज, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा कोषागार कार्यालय व पोस्ट आॅफिस आवारात अतिक्रमणाची दुकाने पोहोचली आहेत. शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध व दुतर्फा अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे स्थायी दुकानदारांची परवड होत आहे. आता तर शासकीय कार्यालयाच्या जागेवरही लघू व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत़ येथेच बाजारासाठी आलेले नागरिक आपली वाहने उभी करत असल्याने कार्यालय परिसराला वाहनतळाचे स्वरुप प्राप्त होते. यामुळे शासकीय कार्यालये असुरक्षित झाली आहे. धोकादायक ठिकाणी लागतात दुकाने !परिसरातील दूरसंचार कार्यालयाच्या शेजारी मोठे विद्युत रोहित्र आहे. या विद्युत रोहित्राच्या खालीच कापड व्यावसायिक दुकाने लावतात. या उच्चदाब रोहित्रावर स्पार्किंग होऊन कापड दुकानाला आग लागल्यास मोठा अनर्थ घडू शकतो़ काही ठिकाणी अर्थिंगच्या तारेवर कपडे लटकविले जातात.प्रवेशद्वारापर्यंत अतिक्रमणशहरातील शासकीय कार्यालयाच्या थेट प्रवेश द्वारापर्यत आज अतिक्रमण झालेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भिंतीला खेटून कपड्यांची दुकाने लावली जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फळ विके्रत्यांनी अतिक्रमण केले आहे, तर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चहा कॅटिंग, पानठेले लागले आहेत.दुकाने हटविण्यास विरोधप्रशासनाने चार वर्षाआधी आठवडी बाजार अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या; मात्र या भागातील व्यापाऱ्यांनी हा बाजार हलवू दिला नाही़ शहरात दोन ठिकाणी पालिकेच्या जागासुद्धा आहेत़ शहर पोलीस ठाण्याने हा आठवडी बाजार अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भरवावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नगर प्रशासनास पाठविला होता. यानुसार काही ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आले; मात्र ही परिस्थिती त्यानंतर केवळ वर्षभर कायम राहिली आणि लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केले.