शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सरकारचे धोरण हेच शेतकरी आत्महत्यांचे कारण - वडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:10 IST

सिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्‍यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले.

ठळक मुद्देलोकजागर परिवाराच्या वतीने ‘वंदन पेरत्या हाताला’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्‍यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले. शेतकर्‍यांचा कल्याणकारी बळीराजाचा इतिहास युवा पिढीच्या मेंदूत जतन करण्यासाठी लोकजागर परिवाराच्या वतीने आयोजित ‘वंदन पेरत्या हाताला’ या शेतकरी स्मृती गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हनून शेतकरी नेते लक्ष्मण वडले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर, तेजराव चेके यांच्यासह  विनोद वाघ, सरपंच रामदास कहाळे, दीपक कायंदे, पंढरी दराडे, अश्‍वीन सानप आदी उपस्थित होते. बळीराजाचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. पुढे बोलताना वडले म्हणाले की, घटनेमध्ये दोनशेपेक्षा जास्त कायदे हे शेतकरीविरोधी करून ठेवले असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी आमच्या उन्नतीकडे लक्ष देत नाही. या देशाला अन्यधान्य आम्ही पुरवतो हा आमचा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी हा आज मुलीचे लग्न मुलांचे शिक्षण करू शकत नाही. त्यामुळे आमच्या मुला-मुलींनासुद्धा आत्महत्या कराव्या लागतात. आमच्या मायमावल्यांना सकस आहार मिळत नसल्याने त्यांना अनेक आजार होत आहेत. एकीकडे आमचे रात्रंदिवस काम करण्याने रक्त आटत आहे तर भांडवलदार गब्बर होत आहे. हे सरकार आम्हाला फक्त अश्‍वासनावर भुलवणारे आहे. ६0 वर्षामध्ये जेवढे काँग्रेसने लुटले नाही तेवढे यांनी नोटाबंदीतच लुटले. नोट बंदीमध्ये  अनेक जन रांगा करून मरण पावले; पण  हे मोठमोठाले व्यापारी, पुढारी भांडवलदार हे कधी रांगेत उभे राहिले, त्यांचे पैसे कधी बदलण्यात आले, असे विविध प्रश्न  त्यांनी उपस्थित केले. तसेच कर्जमाफीसाठी आम्हाला पती-पत्नीला थम्ब देण्यासाठी बंधन घालता तर भांडवलदारांचे कर्ज माफ करताना त्यांना असे बंधन का नाही?  आम्हाला कर्जमाफी नको आमच्या घामाच्या पिकाला हमी भाव द्या. आता यापुढे सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा देऊन शेतकरी व त्यांच्या युवा मुलांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे अवाहन वडले यांनी केले.