शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता, वान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 3:48 PM

संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.

संग्रामपूर (बुलडाणा) : वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाचे दरवाजे सोमवारी संध्याकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत उघण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी दुपारपर्यंत धरणात ६२ टक्के जलसाठा झाला आहे. संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.

रविवारी धरण पाणलोट क्षेत्रात ४७ मिमि पावसाची नोंद झाली असून सोमवारी दिवसभरापासून कोसळधार सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या काही तासात धरणाचे दरवाजे उघडून वान नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मंजूर जलाशय परिचालन सूचीनुसार धरणात जलसाठा वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत हनूमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. त्या पृष्ठभूमीवर वान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा वान प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्षा कडून देण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा