शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

कापसाची मदत अडकली विम्याच्या फे-यात!

By admin | Published: March 11, 2016 2:57 AM

पीक विम्यात नोंद करणार्‍या शेतकर्‍यांनाच मिळणार दुष्काळी मदतीचा लाभ.

बुलडाणा : जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांपैकी ज्या शेतकर्‍यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे व त्याचा हप्ता चुकता केला आहे, अशाच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने मदत दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात शासनाने २ मार्च रोजी शासन निर्णय काढला असून, त्यामुळे जिल्हय़ातील लाखो कापूस उत्पादक शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीकविम्यासाठी नोंदणी केली नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नसल्याचे या निर्णयामुळे स्पष्ट होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांवर अस्मानी व सुलतानी संकटांची मालिका सुरू आहे. खरीप हंगामादरम्यान कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकर्‍यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती, यावेळी मात्र केवळ कापूस उत्पादक शेतकरी वगळून शासनाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांत तीव्र नाराजी पसरली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी शासनाने आता पुन्हा कापूस उत्पादकास सुमारे ३00 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र यामध्ये ही मदत मिळविण्यासाठी केवळ पीक विम्यासाठी नोंदणी केलेल्याच शेतकर्‍यांना पात्र ठरविल्याने दुष्काळात शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.