शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल: दिशा पिंकी शेख

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 20, 2023 18:50 IST

अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा : टोमॅटोला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतकरी मरणाच्या दारात मात्र सरकार बघ्याची भूमिका घेते. आत्महत्या केल्यावर लाख रुपयांचा चेक घेऊन फोटो काढल्यापेक्षा आत्महत्या करू नये, म्हणून आधीच काही पॅकेज द्यावे. शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.

त्या बुलढाणा येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, मुधकर शिंगणे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मधुकर शिंगणे यांनी दोन एकर शेतात टोमॅटो पीक घेतले. त्यांना एक किलोचा उत्पादन खर्च ८ ते १० रुपये आला. त्यानुसार जवळपास २ लाख रुपये उत्पादन खर्च आला आहे. परंतू आजरोजी टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याची खंत दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतात पानापेक्षा टोमॅटो जास्त आहेत. शेतात उभे असलेले हे पीक म्हणजे पोटच्या लेकरासारखे आहे, ते जर असे मरत असेल, तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल.

सध्या मात्र कष्टावर माती पडल्याच्या भावनाही दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्वतःच्या खुर्चीचे चार पाय टिकावेत म्हणून सरकार काही करायला तयार आहेत. शेतकऱ्यांचा माल मुंबईपर्यंत जाऊ शकतो, त्यासाठी रेल्वेमध्ये दोन डबे कोल्ड स्टोरेज करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाल्याला हमीभावाच्या कक्षेत घ्यावे, असा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार - तुपकर

टोमॅटोला भाव मिळत नाही. भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या प्रमाणे सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, कपाशी या पिकांना हमीभाव दिला जातो. त्या प्रमाणे भाजीपाला वर्गीय पिकांनाही हमीभाव द्यावा, से मत तुपकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेतीbuldhanaबुलडाणा