शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान!

By admin | Published: June 17, 2017 12:18 AM

केळी उत्पादक अडचणीत: आधी उन्हाचा, आता वादळी पावसाचा फटका

हिवराआश्रम : केळी उत्पादकांना या उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. उन्हाचे प्रमाण जास्त व पाणी कमी पडल्याने केळीचे उत्पादन घटले; त्यात केळीला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे यावर्षी केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले, तर आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी वादळ- पावसामुळे फडाने भरलेली केळीची झाडेच भुईसपाट होत असल्याचे दिसून येत आहे.पश्चिम वऱ्हाडातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत फळबाग घेण्याकडे वळले आहेत. त्यात केळी या फळबागेकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल आहे. बुलडाणा, वाशिम व अकोला या तीनही जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे; परंतु आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.उन्हाळ्यात यावर्षी जास्त उन तापल्याने केळीच्या फडांना याचा सर्वाधिक फटका बसला. केळीला उन्हाळ्यात जास्त पाणी लागते; परंतु यावर्षी पाणी कमी पडल्याने उत्पादनातही घट आली. आता पावसाळ्यातही केळी फळबागेचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीची झाडे भुईसपाट झाली आहेत. केळीला लागलेल्या घडाचेही यामुळे नुकसान झाले आहे. परिणामी, यावर्षी केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मोडलेल्या झाडांना लाकडाचा आधारसोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी केळीची झाडे पडलेली आहेत. त्यामुळे या पडलेल्या केळीच्या झाडांना लाकडाचा आधार देऊन उभे करण्याचे काम सध्या केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाकडाच्या आधारावर केळीची झाडे सोसाट्याच्या वाऱ्यासमोर किती वेळ तग धरतात, याची शाश्वती नसल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शासनाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.