शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:24 AM

धामणगाव धाडः यावर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. मशागतीकरिता ...

धामणगाव धाडः यावर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. मशागतीकरिता बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर यंदाच्या हंगामात वाढल्याचे चित्र आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी शेणखताकडे वळल्याचे चित्र आहे़

खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करण्यात यावे. बी-बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांपेक्षा शेणखत शेतात टाकत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळिराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला. तरीदेखील यंदा नवीन जोमाने व आशेने शेतकरी कामाला लागला आहे. पैशांची जमवाजमव करून मशागतीच्या कामाला शेतकरी लागले आहे. पेरणीकरिता बियाणे खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होताना दिसत आहेत. बी-बियाणे, खते खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

गेल्यावर्षी अवकाळी पावसाने शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. खरिपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी हाती येईल, या आशेने शेती मशागत करण्याच्या कामाला जिल्ह्यात वेग आला आहे.

मशागतीत यंत्रांचा वापर वाढला

बैलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो. शिवाय बैलजोडीने मशागत करताना अधिक वेळ लागत असल्याने ट्रॅक्टरने शेताची मशागत केली जात असल्याने नागरणी खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे. परंपरागत बैलजोडीच्या साहाय्याने मशागत न करता आधुनिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करताना तो दिसून येत आहे.