शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

अन्न सुरक्षेबरोबरच विमा सुरक्षा - खडसे

By admin | Published: August 16, 2015 11:59 PM

बुलडाणा येथे स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा.

बुलडाणा : शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा, विमा सुरक्षा देण्याचे कार्य शासन करीत असून, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. देशाच्या स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ध्वजारोहण केल्यानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकंमत्री बोलत होते. शेतीला सिंचनाकरिता पाणी मिळण्यासाठी जलक्रांती साधणारे जलयुक्त शिवार अभियान राज्यात सुरू असून, अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर २.५0 लक्ष वार्षिक उत्पन्न असणार्‍या शेतकर्‍यांच्या पाल्यांचे उच्च शिक्षणाचे ५0 टक्के शुल्क भरण्याची जबाबदारी घेतली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी बुलडाणा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्याला १0 कोटी रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहे. तसेच गणित, इंग्रजी अथवा अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविणार्‍या मदरशांना दोन लाख रुपये अनुदान व तीन शिक्षकही शासन देणार आहे, असेही यावेळी पालकंत्री म्हणाले. बालकांच्या पोषणावर बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, अंगणवाडीत पोषण आहाराबरोबरच आता दूधही दिल्या जाणार आहे. त्यासाठी दूध भुकटीचा उपयोग केल्या जाणार आहे. राज्याच्या विकासासाठी नागपूर ते मुंबई सहापदरी राज्य महामार्ग निर्माण केल्या जाणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीवर जवळपास ५५ हजार कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. त्याचा जिल्ह्याला फायदा होणार आहे. तर सामान्यांना महाग पडणारी औषधे शासन उभारत असलेल्या जेनेरिक दुकानांमध्ये स्वस्त दरात दिल्या जात आहे. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.