शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खामगाव : गारपीटग्रस्त भागाची कृषी मंत्र्यांकडून पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:27 IST

खामगाव :  रविवारी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे  झालेल्या नुकसानाची सोमवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी दोन दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करतानाच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफ आणि विमा कंपनीच्या माध्यमातून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पीकविमा न काढलेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देदोन दिवस सतर्कतेचा इशारा शासनाकडून तत्काळ मदतीची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  रविवारी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे  झालेल्या नुकसानाची सोमवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी दोन दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करतानाच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफ आणि विमा कंपनीच्या माध्यमातून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पीकविमा न काढलेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.रविवारी अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे २७७ गावातील सुमारे ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला. या पार्श्‍वभूमीवर खामगाव तालुक्यातील विविध शेतीची पाहणी त्यांनी केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, तालुका कृषी अधिकारी  एस.एस.ढाकणे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण,  तहसीलदार सुनील पाटील, शत्रुघ्न पाटील, डॉ.महाले, नायब तहसीलदार देशमुख, पिंपळगाव राजा येथील ठाणेदार सुरेंद्र अहिरकर उपस्थित होते. या पाहणी दौर्‍याला बोथा फॉरेस्ट येथून सुरुवात झाली. येथे हरिभाऊ कांडेलकर, शत्रुघ्न कांडेलकर आणि शालीग्राम सोनोने यांच्या शेतात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली.  त्यानंतर नांद्री येथील सोनाजी कोळपे यांच्या शेतातील पीक नुकसानाची पाहणी करण्यात आली. काळेगाव येथील मुकुंदा गायगोळ, बेलखेड येथील सुनील मुंडे, वर्णा येथील भरतसिंह इंगळे, गेरू माटरगाव येथील विजयसिंह साबळे, श्रीधरनगर येथील गजानन गिर्‍हे, मुकुंदा गायकवाड यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी अधिकार्‍यांना तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत, कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी ज्ञानगंगापूर येथील अजय काशिनाथ महाले या युवकाच्या कुटुंबियांचे सात्वन केले. वादळीवार्‍यामुळे झाड अंगावर पडून अजय महाले याचा रविवारी मृत्यू झाला होता. 

खामगाव तालुक्यातील ६0 गावांमध्ये नुकसान! खामगाव तालुक्यातील ६0 गावांमधील पिकांचे रविवारी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. यामध्ये वर्णा, कोंटी, सारोळा, दिवठाणा, वझर, श्रीधरनगर, लोखंडा, किन्ही महादेव, चिंचपूर, हिवरा बु., नांद्री, लांजुड, पोरज, काळेगाव, निमकवळा, वडजी, कुंबेफळ, भालेगाव बाजार, टाकळी तलाव, कासारखेड, शिर्ला नेमाने, निरोड, हिवरखेड, आवार, कोलोरी, अडगाव, पलशी बु., सुटाला बु, वाडी, जयपूर लांडे, कोक्ता, माक्ता, शिरजगाव देशमुख, खुटपुरी, घाटपुरी, नांद्री, मांडणी, बोथा, शेंद्री, चिंचखेड बंड, खेर्डा, बेलखेड, कंचनपूर,  हिवरखेड, आवार, गेरु माटरगाव, झाडेगाव, लोणीगुरव, दत्तापूर, बोथाकाजी, सावखेड, भंडारी, उमरा, तरोडानाथ आदी गावांचा समावेश असून, शेगाव तालुक्यातील डोलारखेड, गुडगाव, वनगाव, कठोरा, चिंचखेड, भास्तन, सगोडा, हातखेड, पहुरपुर्णा, लासुरा, कासरखेड, जवला बु., जवला पलसखेड, चिंचोली, काटेपूर्णा, गौलखेड, खेर्डा आदी गावांसह सुमारे १८ गावांमध्ये नुकसान झाले. 

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरkhamgaonखामगाव