शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

#खामगाव कृषि महोत्सव : शेती करताना विचाराची दिशा बदला!  -  संजय उमाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 17:58 IST

खामगाव : शेती नफ्यात आणायची असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करताना आपल्या विचाराची दिशा बदलायला हवी, असे प्रतिपादन जळगाव जामोद येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संजय उमाळे यांनी केले. 

ठळक मुद्देखामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयोजित कृषि व कृषि पुरक शेती पद्धती विषयावर शेतकरी मार्गदर्शन सत्र. शेततळ्याच्या काठावर व शेतीच्या बांधावर सुद्धा विविध प्रकारचे फळझाडे घेवून उत्पादन घेवू शकता येते. या मार्गदर्शन सत्रला कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

खामगाव : शेती अर्धवेळ नाही तर, पुर्णवेळ व्यवसाय समजला पाहिजे. शेती करताना नकारात्मक भूमीका ठेवू नका. शेती नफ्यात आणायची असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करताना आपल्या विचाराची दिशा बदलायला हवी, असे प्रतिपादन जळगाव जामोद येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संजय उमाळे यांनी केले. ते खामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयोजित कृषि व कृषि पुरक शेती पद्धती विषयावर शेतकरी मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. पुढे बोलताना संजय उमाळे म्हणाले की, शेती करताना नियोजन महत्वाचे आहे. एकात्मीक पद्धतीचा शेती अवलंब केल्यास उत्पादन वाढीबरोबरच कुटूंबाच्या विविध गरजाही पूर्ण होतील. त्यासाठी शेती करताना पशुपालन, रेशीम उद्योग हे जोडधंदेही करावे. कोरडवाहू शेती असेल तर उमेद गमावू नका. कोडवाहू शेतीत शेततळे घेतल्यामुळे पावसाचे जमा झालेले पाणी पीकांसाठी वापरून आपल्याला उत्पादन वाढविता येईल. शेततळ्याच्या काठावर व शेतीच्या बांधावर सुद्धा विविध प्रकारचे फळझाडे घेवून उत्पादन घेवू शकता येते. त्यामध्ये सीताफळ, रामफळ, संत्रा, मोसंबी, वाल यासारखे झाडे लावू शकता. शेतकºयांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी स्वत: पिकविलेला माल स्वत: विक्री करणे महत्वाचे आहे. व्यापाºयाच्या भरवश्वार माल विक्री करणे तोट्याचे व अवघड होऊन बसले आहे. आंतर पीक, मिश्र पीक वाढवावे, असे आवाहनही संजय उमाळे यांनी यावेळी केले. या मार्गदर्शन सत्रला कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकºयांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवagricultureशेती