शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

#खामगाव कृषी महोत्सव : शेतकर्‍यांना पडली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची भुरळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:02 IST

खामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 

ठळक मुद्देविविध स्टॉलवर बघण्यासाठी जिल्हय़ातील ग्रामीण भागातून झाली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. कृषी महोत्सवात प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र प्रात्यक्षिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकरी बचत गटाच्या सदस्यांनी प्रक्रिया यंत्राची माहिती उत्सुकतेने जाणून घेताना दिसत आहेत. फलोत्पादन शेतीकडे बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांचा सर्वाधिक कल दिसून आला.  या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली बी रहित मोसंबी, लिंबू, विविध प्रकारचा भाजीपाला पिके आदींची माहिती शेतकरी घेत आहेत. सौर ऊर्जेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव मोठी गर्दी करीत आहेत. संरक्षित शेतीच येत्या काळात तारणार असल्याने, शेतकर्‍यांचा त्याकडेही ओढा असल्याचे दिसून येत आहे. तसेच हवामान बदल व पावसाची अनिश्‍चितता पाहता, शेतकरी त्रस्त आहे. त्या दृष्टिकोनातून कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले आहे. पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातीवंत गायी, म्हैशी, शेळय़ांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकर्‍यांनी वळावे आणि शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. यासाठी या ठिकाणी शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे, तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स्य व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे.  कीटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवर येणारी कीड व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधीची विस्तृत माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान पाहता,  कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती उपलब्ध केली आहे. संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून तंत्रशुद्ध माहिती या ठिकाणी शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले बचतगटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला शेतमाल, खाद्यपदार्थ शेतकरी व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.  

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव