शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पांडुरंगाच्या उत्सवातील कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:12 IST

बुलडाणा : संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन भजन करणार्‍या गंगाजीबुवा मवाळ यांनी ३७१ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पांडुरंगाच्या उत्सवाची परंपरा त्यांचे वंशज आजही जपत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पांडुरंगाच्या उत्सवातील माघ शुद्ध एकादशीच्या मुख्य कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला मिळाला आहे. 

ठळक मुद्दे३७१ वर्षांपासून होतो उत्सव तुकोबारायांच्या टाळकर्‍यांचे वंशज जपताहेत परंपरा 

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन भजन करणार्‍या गंगाजीबुवा मवाळ यांनी ३७१ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पांडुरंगाच्या उत्सवाची परंपरा त्यांचे वंशज आजही जपत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पांडुरंगाच्या उत्सवातील माघ शुद्ध एकादशीच्या मुख्य कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला मिळाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन भजन करणारे एकूण चौदा टाळकरी इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यातील एक होते कडूस ता. राजगुरुनगर जि. पुणे येथील गंगाजीबुवा मवाळ! या चौदाही टाळकर्‍यांचे नावासह पुतळे देहू संस्थानाने भव्य स्वागत कमानीवर कोरलेले आहेत. माघ शुद्ध दशमी हा तुकोबांचा अनुग्रह दिन! याचदिवशी ओतूरच्या बाबाजी चैतन्य या सद्गुरूंनी तुकाराम महाराजांना ‘रामकृष्णहरी’ या उघड्या गुरुमंत्राचा स्वप्नामध्ये उपदेश केला होता,  हे स्वत: तुकोबारायांनी आपल्या ‘सत्यगुरुराये कृपा मज केली’ या प्रसिद्ध अभंगात सांगितलेले आहे. एकेवर्षी याचदिवशी तुकोबांनी त्यांचे टाळकरी गंगाजीबुवा मवाळ यांना विठ्ठलाची मूर्ती दिली. तसेच दरवर्षी सहा दिवस पंढरीच्या विठ्ठलाचे वास्तव्य कडूसला राहील, असे सांगितले. तेव्हापासून पांडुरंगाचे आगमन व वास्तव्य यानिमित्ताने गंगाजीबुवांनी उत्सव सुरू केला. या उत्सवाची परंपरा तुकोबारायांचे टाळकरी असलेले गंगाजीबुवांचे वंशज दरवर्षी नित्यनेमाने जपत आहेत. पांडुरंगाचा हा उत्सव माघ शुद्ध दशमी म्हणजे २७ जानेवारीपासून सहा दिवस कडूस ता. राजगुरुनगर जि. पुणे येथे चालणार आहे. या उत्सवाचे यंदा ३७२ वे वर्ष आहे. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाऊलघडीचा कार्यक्रम होऊन पांडुरंगाला साश्रूनयनांनी निरोप दिला जातो. या उत्सवात पांडुरंग वास्तव्याला असतो, अशी धार्मिक श्रद्धा असल्याने हा उत्सव पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या प्रासादिक मानल्या जाणार्‍या उत्सवात २८ जानेवारी रोजी  माघ शुद्ध एकादशीचे कीर्तन करण्याचा मान यावर्षी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील संत बाळाभाऊ महाराजांचे चौथे वंशज गोपाल महाराज पितळे यांना मिळाला आहे. 

तुकाराम महाराजांनी लावली होती पाच वर्षे हजेरीपश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या व गंगाजीबुवा मवाळ यांनी सुरू केलेल्या पांडुरंगाच्या उत्सवाची सुरूवात तुकाराम महाराजांनी करून दिली. त्यानंतर या उत्सवाला वैकुंठगमनापूर्वी स्वत: संत तुकाराम महाराज सतत पाच वर्षे उपस्थित राहिल्याचा दाखला उपलब्ध आहे.  त्यामुळे पांडुरंगाच्या या उत्सावाला धार्मिक इतिहास लाभलेला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा