शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 00:47 IST

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे.

लोणार : जिल्ह्याचे नव्हे, तर जागतिक वैभव असलेल्या लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला नोव्हेंबर २०२० मध्ये प्राप्त झालेला ‘रामसर’ दर्जा धोक्यात आला आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर फेरमूल्यांकन करण्यासाठी आलेल्या चेन्नई येथील पाच संशोधकांच्या पथकाच्या प्रमुख डॉ. काकोली बॅनर्जी यांनी हा संकेत दिला आहे. या युनिक वेटलॅण्डची दुरवस्था पाहून त्यांनी आश्चर्य आणि खेद व्यक्त केला. नबीच्या नाल्यातून सरोवरात जाणारे सांडपाणी प्रामुख्याने यास जबाबदार असल्याचे मत संशोधकांचे आहे.

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे. निरीनेच त्याची निर्मिती केली होती. नागपूर खंडपीठामध्येही दाखल एका प्रकरणात वारंवार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरीही त्याचे काय आम्हाला, अशी मानसिकता बनली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम करताना निरीने भविष्यातील लोणार शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार न करताच कमी क्षमतेच्या या प्रकल्पाचे बांधकाम केल्याचा सूर आहे. शहराची आज ४० हजार लोकसंख्या झाली आहे. लोणार शहरात होणाऱ्या पाण्याच्या वापरापैकी ६५ टक्के सांडपाणी नबीच्या नाल्याद्वारे पूर्वीही आणि आताही जात आहे.

या नाल्यावरील सांडपाणी विशिष्ट वनस्पतीच्या मुळाच्या साहाय्याने १४ टँकमध्ये जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतरत्र पंपाद्वारे उपसा करण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे काही येथे होत नाही. उभारण्यात आलेला प्रकल्प कुचकामी असून पाऊस पडल्यानंतर येथील पाणी अेाव्हर फ्लो होऊन घाणीसह हे सांडपाणी सरोवरात जातच आहे.

जैवविविधतेवर विपरीत परिणाम -सरोवरात जाणाऱ्या या सांडपाण्यामुळे विवरातील दुर्मीळ जैविक संस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सोबतच सरोवराच्या पाण्याचा पीएचमध्येही फरक पडत आहे. दरम्यान, हा प्रकल्प अद्यापही निरीच्या ताब्यात आहे की पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे, याबाबत संभ्रम आहे. जबरदस्तीने तो पालिकेकडे दिला गेल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. या प्रकल्पावर देखभाल-दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी खर्च झाला असून प्रकल्पातील पाणी उपसा करून नेमके कोठे सोडण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.

नबीच्या नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून नियमीत मोठ्या प्रमाणावर घाण सरोवरात जात आहे. त्यामुळे या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्थेवर आघात हो असल्याचे प्राथमिक स्तरावरील पहाणीत आढळून आले आहे. या रामसर वेटलॅन्ड साईटचे संवर्धन गरजेचे आहे.डॉ. काकोली बॅनर्जी, संशोधक, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल मॅनेटमेंट (चेन्नई) 

टॅग्स :buldhanaबुलडाणा