शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

बोगस पपई रोपांमुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:36 AM

मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्‍यांनी तायवान पपईची लागवड केली खरी; परंतु बोगस व निकृष्ट दर्जाच्या पपई रोपांमुळे दोघांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देआर्थिक फटका : मोमीनाबाद येथील शेतकरी त्रस्त; कृषी अधिकार्‍यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : सतत चार ते पाच वर्षांपासून विविध संकटांचा सामना करीत असलेला तालुक्यातील शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. मुळातच कष्टाळू व जिद्दी असणार्‍या काही शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जास्त उत्पन्नाच्या आशेने नवीन पिके अवलंबिली आहेत. यामध्ये मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्‍यांनी तायवान पपईची लागवड केली खरी; परंतु बोगस व निकृष्ट दर्जाच्या पपई रोपांमुळे दोघांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.मोमीनाबाद येथील सचिन संजय काळे या तरूण शेतकर्‍याने शेतीला नवी दिशा देत उत्पन्नवाढीचा मार्ग म्हणून तायवान पपईची दोन हजार रोपांची लागवड केली. सचिनने मोहोळ जि. सोलापूर येथील एका रोप वाटिकेमधून २ मार्च १७ रोजी ११ रूपये प्रमाणे दोन हजार रोपे खरेदी केली व मार्च महिन्यातच दोन ते अडीच एकर क्षेत्रावर लागवड केली. यानंतर  खते, फवारणी औषधे, मजुरी, ठिबक सिंचन असा एकूण दीड लाख रुपये खर्चही केला; परंतु झाडे मोठी होतानाच यामधील काही झाडांना फळधारणा होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोमीनाबाद येथीलच सुरेश लक्ष्मण गवळे यांनीसुद्धा याच रोपवाटिकेमधून मार्च महिन्यात ११ रुपये प्रमाणे चार हजार पपई रोपे रुपये ४४,000 रुपयाला खरेदी केली व लागवड केली.  त्यांनीही खते, फवारणी, औषधे, निंदण, ठिबक सिंचन व इतर खर्च मिळून पपई बागेसाठी जवळपास साडेतीन लाख रूपये खर्च केला; परंतु त्यांच्याही ५0 टक्के झाडांना फळधारणा झाली नसल्याने या दोघांनीही रोपवाटिका संचालकाशी तीन महिन्यांपूर्वी संपर्क साधला. चार ते पाच वेळा फोन केल्यावर रोपवाटिकेचे प्रतिनिधी हे मोमीनाबाद येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गेले; परंतु यानंतरही काही प्रतिसाद न मिळाल्याने दोनही शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍यांकडे तक्रार केली. यानंतर तालुका कृषी अधिकारी पी. ई. अनगाईत, पं.स. कृषी अधिकारी चव्हाण यांनी सदर शेतांवर जावून पाहणी केली असता, नुकसान झाल्याचे आढळले. पंचनामा करण्यात आला व त्यामध्ये ३८ टक्के झाडे वांझ असून, फळधारणाच झाली नसल्याचे व फळधारणा झालेल्या झाडांनाही कमी फळे लागल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. त्यामुळे या शेतकर्‍यांचे ५0 टक्के नुकसान झाले आहे. प्रति झाड एक क्विंटल माल निघत असताना अर्धी झाडे वांझ निघाल्याने सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

शेतकर्‍यांनी स्वत: रोपे तयार करावीतपपई किंवा अन्य फळझाडांची रोपे विकत घेताना त्यावर कोणतेही लेबल नसते. कायद्याचा आधार नसतो, कोणत्या बियाण्याचे रोप आहे, याची खात्रीही नसते. बियाण्यांची मुदत काय होती. जात, प्रकार अशी कोणतीही माहिती व खात्री रोप घेताना नसते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता पाहता शेतकर्‍यांनी स्वत: रोपे आपल्या डोळ्यांसमोर आपल्या शेतात तयार केल्यास त्याचा त्यांना फायदा होईल.

मोठय़ा हिंमतीने पपईची लागवड केली होती. आवश्यक तो सर्व खर्चही केला; परंतु झाडेच वांझ निघाल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून, खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, ही अपेक्षा आहे.- सचिन काळे,शेतकरी मोमीनाबाद

याबाबत बोडखे रोपवाटिकेचे मालकांशी फोनवर चर्चा केली असता, त्यांनी तुमच्याच्याने जे होईल ते करा, अशा शब्दात अवहेलना केली. शेतकर्‍यांचा गैरफायदा घेतला जातो. झालेले नुकसान खूप जास्त आहे. त्यामुळे कृषी विभागाने न्याय मिळवून द्यावा.- सुरेश गवळे,शेतकरी मोमीनाबाद.