शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शरद पवार यांनी फक्त घर भरण्याचे काम केले - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:25 IST

शरद पवार यांनी केवळ घर भरण्याचेच काम केले घणाघाती टीका अमित शाह यांनी शुक्रवारी चिखली येथे केली.

चिखली (बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल करत शरद पवार यांनी केवळ घर भरण्याचेच काम केले घणाघाती टीका अमित शाह यांनी शुक्रवारी चिखली येथे केली. त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नव्हे तर परिवारवादी पार्टी असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाशरप पवारांनी केलेल्या कामापेक्षा आम्ही पाच वर्षांत केलेली कामांची यादी सांगायची झाल्यास आम्हाला सात दिवस भाागवत सप्ताह सारखा सप्ताह घ्यावा लागेल,असे अमित शाह यावेळी म्हणाले.पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र शिक्षण, कृषी, उद्योग यामध्ये आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणी महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. परंतू गेल्या पाच वर्षात राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे. मोदी सरकार आल्यानंतर सर्वात मोठा निर्णय झाला तो, म्हणजे कश्मिरमधील कलम ३७० हटविण्याचा. परंतू यावरही अनेक विरोधकांनी आवाज उठवला. हे कलम हटविल्यास काश्मिरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे काँग्रेसचे गुलाम नबी म्हटले होते, परंतू रक्ताचे पाट तर दूरच एक थेंबही रक्त याठिकाणी वाहिले नाही. कलम ३७० हटविण्यामागे महाराष्ट्राचा काय फायदा, असे अनेक प्रश्न विचारले गेले. परंतू देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण होते. आम्हाला देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, काश्मिर हे भारत देशाचा मुकूट आहे, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

देशात महाराष्ट्र नंबर एक बनवणारशाह म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना एकाही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता. केंद्रातील काँग्रेस सरकारने कायम राज्यातला मुख्यमंत्री बदलण्याचे काम केले. मात्र, तु्म्ही फडणवीसांना निवडून दिले आणि मोदींनी त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. पुढील पाच वर्षामध्ये देशात महाराष्ट्र नंबर एक बनवणार असल्याचेही शाह यांनी सांगितले.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाbuldhanaबुलडाणाchikhli-acचिखलीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस