शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

वाहनचालकास लुटण्याच्या नादात स्वत:चाच प्राण गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 10:59 IST

Crime News : मृतकाचे नाव संजीव भीमराव जाधव (३७, रा. नांद्राकोळी, ता.जि. बुलडाणा) असे आहे.

ठळक मुद्दे अंबाशी फाट्यावर ‘त्या’ व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न चिखली पोलिसांकडून दोघांना अटक

चिखली : तालुक्यातील अंबाशी फाट्यानजीक शेतात मृतावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीचा खूनच झाल्याचे अखेर निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्यासह आरोपींना अटक तसेच मृतकाची ओळख पटविण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. मृतकाचे नाव संजीव भीमराव जाधव (३७, रा. नांद्राकोळी, ता.जि. बुलडाणा) असे आहे.

अंबाशी फाटा परिसरातील एका शेतात मृतक संजीव जाधव याचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी आढळला होता. धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याचा संशय होता. मात्र, मृतकाची ओळख पटली नसल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत मृतकाची ओळख पटविण्यासह या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित म्हणून बुलडाणा तालुक्यातीलच सव येथील गोपाल लव्हाळे (२५) यास ३ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. चिखली पोलिसांनी नांद्राकोळी येथीलच भारत गजानन विरसिद (२८) यास देखील अटक केली आहे. भाड्याने बोलविलेल्या वाहनचालकाचे दागिने लुटण्याच्या नादात मृतकाने स्वत:चाच जीव गमावल्याची बाब या प्रकरणात समोर आली आहे.

असे घडले हत्याकांड

मुख्य आरोपी गोपाल लव्हाळे याच्याकडे कार आहे. व तो ती कार भाड्याने चालवितो. याची माहिती मृतक संजीव जाधव व या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी भारत वीरसिद या दोघांना होती. ते दोघे २ डिसेंबर रोजी चिखली येथे आले होते. त्यांनी आरोपी लोखंडेची कार भाड्याने केली होती. आरोपी गाडीसमवेत अंबाशी फाटा येथे पोहोचल्यानंतर मृतक संजय व भारत हे दोघे गोपालच्या कारमध्ये बसले. मात्र दोघांची नजर गोपाल याच्याकडील अंगठी व चेनवर पडली. तेथून जवळच असलेल्या काटोडा या गावाकडे गाडी नेण्यास सांगून रस्त्यावर दोघांनी शौचास जायचे आहे, असे सांगून गाडी थांबवायला सांगितली. यावेळी गोपालच्या अंगावरील दागिने चाकूचा धाक दाखवित हिसकावण्याचा प्रयत्न संजय आणि भारतने केला. यावेळी झालेल्या झटापटीत गोपालने भारतच्या हातातील चाकू हिसकावला आणि मृतक संजीव याच्यावर वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे पाहून भारत घटनास्थळावरून पळून गेला. तसेच मुख्य आरोपीनेदेखील तेथून पळ काढल्याची माहिती आहे.

असा झाला उलगडा

सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना अंबाशी येथील प्रकाश देशमुख यांच्या शेतात मृतदेह दिसल्याने घटना ही उघडकीस आली. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सव येथून गोपालला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याशी झटापट करणाऱ्या दोघांना तो ओळखत नसल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. दरम्यान मोबाइल नंबरच्या आधारे रात्री ११ वाजता चिखली पोलीस नांद्रकोळी येथे पोहोचले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा