शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मेहकर : लोणी गवळी येथील कर्मचार्‍यांना मुख्यालयाची अँलर्जी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:24 IST

मेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी  १९ डिसेंबर रोजी दिला आहे.

ठळक मुद्देकारवाई न झाल्यास पं.स. समोर उपोषण राष्ट्रवादी किसान सेलच्या जिल्हा उपाध्यक्षांचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा  उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी  १९ डिसेंबर रोजी दिला आहे.तालुक्यातील लोणीगवळी येथे विविध शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, लाइनमन, तलाठी जि.प शाळेचे शिक्षक, कृषी सहायक यासह इतरही कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. सततच्या बाहेर गावावरून येण्या-जाण्यामुळे गावातील विविध विकासकामांवर याचा परिणाम होत आहे. तसेच गावातील अनेक विकासाची कामे खोळंबली आहेत. काही नागरिकांना या अधिकार्‍यांच्या मागे फिरावे लागते. सदर कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे, असे निर्देश असतानाही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. अनेक कर्मचार्‍यांनी गावातून स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टे करून घेतले आहेत. सदर भाडेपट्टय़ाची चौकशी करावी व संबंधित कर्मचार्‍यांना लोणी गवळी येथे मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अन्यथा ३0 डिसेंबर रोजी पंचायत समिती मेहकरच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेना जिल्हा उपाध्यक्ष माधव सखाराम वानखेडे, आरपीआय तालुका कार्याध्यक्ष देवीदास गोविंदराव खंडारे, भास्कर बाजीराव खंडारे, रमेश वानखेडे, भास्कर गवळी, राजेश नवले, सोपान कंकाळ, किसन इंगळे, दत्तात्रय जाधव, डॉ. श्रीराम मेहेत्रे, रामभाऊ कदम, वसंत खंडारे, दीपक गवळी आदींनी दिला आहे. 

रोहयोची कामे मजुरांना द्या!लोणी गवळीसह वरुड, आंधृड, भोसा, उमरा देशमुख या परिसरात रोजगार हमीची कामे ही मजुरांमार्फत होत नाहीत. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांवर उपासमारीची पाळी येते. रोजगार हमींची कामे मजुरामार्फतच करावी, असे शासनाचे निर्देश असतानाही या परिसरातील कामे जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात येतात. अनेक गरीब मजुरांकडून कागदपत्रे घेऊन कामाचे मस्टर भरून घेण्यात येते. यामुळे खर्‍या मजुरांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे रोजगार हमीची कामे मजुरांमार्फतच करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय मेहकरचे तालुका कार्याध्यक्ष, देवीदास गोविंद खंडारे, माधव वानखेडे, जगदीश अवचार आदींनी केली आहे.