शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मेहकर : लाखो रुपये खचरूनही सारंगपूरवासी तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:49 IST

सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देपाणी घ्यावे लागते विकत पाण्याची टाकी झाली जीर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर तालुक्यात उन्हाळय़ामध्ये अनेक गावांमध्ये पाणी समस्या निर्माण होत असते. काही गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ज्या गावात सतत पाणीटंचाई निर्माण होते, अशा गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महाजल योजना राबविण्यात आली होती; मात्र सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये मेहकर तालुक्यात जवळपास ७0 टक्के गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती व महसूल विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात. ज्या गावात दरवर्षी पाणीटंचाई असते अशा गावामध्ये मागील दोन, तीन वर्षांच्या काळात महाजल योजने अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र या योजनेचा गावकर्‍यांना  फायदा झालेला दिसत नाही. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने महाजल योजना पूर्णपणे रखडली असून शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. असाच प्रकार पैनगंगा नदीच्या तिरावर असलेल्या सारंगपूर गावी पाहायला मिळत आहे. सारंगपूर हे गाव पैनगंगा नदीच्या अगदी काठावर आहे; मात्र या गावात उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये पाणीटंचाई उद्भवते. सारंगपूर येथील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी या गावात महाजल योजना राबविण्यात आली होती. या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. या योजनेंतर्गत विहीर, पाण्याची टाकी, पाइपलाइन ही सर्व कामे केलेली आहेत. विहिरीला पाणीच नाही, पाण्याची टाकी बांधलेली असून, टाकी कित्येक वर्षांपासून कोरडीच आहे. या पाण्याच्या टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, टाकीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. सदर टाकी अतिशय जीर्ण झाल्याने कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. सदर टाकी गावामध्ये बांधलेली असल्याने गावकर्‍यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. गावातील पाणी समस्या मिटावी यासाठी गावकर्‍यांनी संबंधित अधिकार्‍याकडे निवेदने, तक्रारी व काही वेळेस उपोषणही केलेले आहे; मात्र अधिकार्‍यांवर याचा कोणताच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे गावकर्‍यांना खासगी विहिरीवरून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून  चौकशी होऊन जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीसंदर्भात उपाययोजना करावी व पाणी प्रश्न दूर करावा, अशी मागणी होत आहे.   

पाण्याची टाकी दुरुस्त करण्याची रासपची मागणीसारंगपूर येथे कित्येक वर्षांपासून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  या टाकीपासून गावकर्‍यांना धोका निर्माण झाला आहे. सदर टाकीची दुरुस्ती करावी अथवा  पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रासपचे मेहकर तालुकाध्यक्ष गजानन बोरकर यांनी तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे केली आहे.

ग्रामपंचायतने ठराव देऊनही अधिकार्‍याकडून टाळाटाळसारंगपूर येथील जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा मेहकर यांच्याकडे दिलेला आहे; मात्र अधिकार्‍याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

सारंगपूर येथे महाजल योजनेतून पाण्याची टाकी बांधलेली आहे. सदर टाकी जीर्ण झाल्याने गावकर्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर टाकी पाडावी यासाठी संबंधित विभागाकडे ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे.- दीपक हुंबाड, ग्रामसेवक, सारंगपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkar Bypassमेहकर बायपास