शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

पदाधिकारी महिला कागदोपत्री राहू नये!

By admin | Published: May 17, 2017 12:31 AM

लोकमत परिचर्चेतील सूर : महिला सक्षमीकरणानेच लोकशाही बळकट होईल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पतीराजांनी कारभारात हस्तक्षेप केल्यास संबंधित महिला पदाधिकाऱ्यास पद गमवावे लागणार आहे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर निर्णय योग्य असून, त्यामुळे महिलांना काम करण्याची संधी मिळेल. खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल व महिला पदाधिकारी केवळ कागदोपत्री राहणार नाहीत, असा सूर मंगळवारी ‘पतींच्या हस्तक्षेपामुळे जाणार महिला सदस्यांचे पद ? हा निर्णय योग्य की अयोग्य?’ या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला. महिला पदाधिकारी घरात आणि पतिराजांचा कारभार जोरात, अशी स्थिती असल्यामुळे पतीराजांच्या हस्तक्षेपामुळे महिला सदस्याचे पद रद्द, या निर्णयाची अंमलबजावणी जोरदार सुरू झाली आहे. पतीराजांना महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या शासकीय कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही. महापालिका, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हस्तक्षेप करणे, गटार का उपसले नाही, पाणी का सोडले नाही, औषध का फवारले नाही, टँकर का पाठविला नाही, म्हणून शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणल्यास त्यांच्या पत्नीला महापौर किंवा नगरसेविका पद गमवावे लागणार आहे. महिला पदाधिकाऱ्यांकडे निर्णयक्षमता यावी, एखादा निर्णय चुकला तरी चालेल; पण त्यांना निर्णय घेता यावा, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांना आरक्षण दिले असताना ही पदे केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली जाऊ नयेत, याचीही खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे. सदर निर्णय योग्य असून, महिलांना कामाची संधी मिळेल, लोकशाही बळकट होईल, असा सूर परिचर्चेत उमटला. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने विविध क्षेत्रात महिलांना आरक्षणाच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला, तरी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या महिलेला किंवा पुरूषाला त्या क्षेत्रातील किती ज्ञान आहे, याबाबत काही अटी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलेला चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळेल, या माध्यमातून विकास साधता येईल व खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल. -किरण खिल्लारे, बुलडाणाराज्यात पुरूषांच्या तुलनेत महिला पदाधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यंत कमी असून, काम करण्याची क्षमता जास्त आहे. जर निवडून येणाऱ्या महिलांना त्यांच्या अधिकारात ढवळा-ढवळ न करता अधिकार वापरण्याची संधी दिली तर आपल्या देशात आमूलाग्र बदल घडेल व राजकारणातील भ्रष्टाचाराला आळा बसेल. त्यामुळे महिला प्रतिनिधींआडून त्यांचे काम त्यांचे पती करत असतील तर त्या महिलेचे पद रद्द करण्याचा निर्णय योग्य राहील. त्यामुळे महिलांना काम करण्याची चांगली संधी मिळेल व त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होईल. -मीना कुलकर्णी, बुलडाणानिवडणूक आयोगाने महिलांना व्यक्तिमत्त्व व त्यांच्या कार्यशीलतेला वाव देण्यासाठी निवडणुकीत अनेक पदे राखीव ठेवली आहेत; परंतु सुरुवातीपासून संबंधित पदावर असलेल्या महिलांचे नातेवाइक त्या महिलेला स्वावलंबीपणे काम करू देत नाहीत. प्रत्येक महिला आपल्या घराला निट-नेटके ठेवते. घरासाठी चांगले नियोजन करते. घरातील लहान सदस्यांचे संगोपन करते, वृद्ध मंडळीची देखभाल करते. यावरून महिलेमध्ये चांगले काम करण्याची निर्णय क्षमता असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे शासनाने जो निर्णय घेतला तो चांगला असून, अनेक महिलांना स्वतंत्र काम करण्याची संधी मिळेल.- आरती राऊत, बुलडाणामहिलांना ५० टक्के आरक्षण देऊन शासनाने महिलांचा सन्मान केला आहे; परंतु राजकारण क्षेत्र फार वेगळे आहे. राजकारणात येणाऱ्या प्रत्येक महिला त्या पदासाठी किंवा त्या क्षेत्रासाठी सक्षमपणे काम करण्याचा निर्णय घेऊ शकतील, असे सांगता येत नाही. अनेक महिला पदाधिकारी प्रत्येक निवडणुकीत नवीन असतात. अशा परिस्थितीत त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ज्या महिला स्वतंत्रपणे काम करतात, ते कौतुकास पात्र आहेत; मात्र ज्या महिलांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी मार्गदर्शन मागितल्यास व संबंधितांनी मार्गदर्शन केल्यास हरकत नाही. म्हणून सदर निर्णय अयोग्य आहे.- अशोक इंगळे, माजी जि.प.सदस्य,बुलडाणाशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे महिलांना न्याय मिळेल; परंतु प्रत्येक पदाधिकाऱ्याला चांगले काम करण्यासाठी सल्लागाराची गरज असते. त्यामुळे महिला पदाधिकारी पती किंवा कुटुंबातील मोठ्या सदस्यांचा सल्ला घेतात. त्याला कारभारात हस्तक्षेप म्हणता येणार नाही. याशिवाय महिलांना सक्षम करायचे असेल तर निवडणुकीच्या वेळी महिलांचे शिक्षण, त्या क्षेत्रातील अनुभवाची अट टाकल्यास पुढील निवडणुकीत सक्षम महिला निवडून येईल. यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.-अनंता लहासे, बुलडाणा