शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

हॉटेल आणि पाणीपुरीच्या गाडीवरून कांदा गायब!

By admin | Published: August 25, 2015 2:07 AM

कांद्याने गाठली शंभरी; व्यावसायिकांसह गृहिणींचे बजेट कोलमडले.

खामगाव: गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर दिवसागणिक गगनाला भिडत आहेत. कांद्याच्या भावाने शंभरी गाठल्याने शहरातील काही हॉटेल, घरगुती खानावळ आणि पाणीपुरीच्या गाडीवरून आता अचानक कांदा गायब झाल्याची वस्तुस्थिती ह्यलोकमतह्णच्या पाहणीदरम्यान उघडकीस आली. कांद्याचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने भाव वाढले आहेत. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात २000 ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भावाने मिळणारा कांदा आता तब्बल सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंंंत पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांदा ७0 ते ८0 रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. साधारण एका मध्यम हॉटेलमध्ये दररोज ३0 ते ४0 किलो कांदा लागतो. शाकाहारी हॉटेल्समध्ये भाज्यांचा रस्सा हा कांद्यापासूनच तयार केला जातो. त्यासाठी मोठया प्रमाणात कांदा लागतो. शिवाय पाणीपुरी, पावभाजी, उत्तप्पा, डोसा, मिसळ यांसारख्या अनेक खाद्यपदार्थांसाठीही कांदा भरपूर लागतो. नाश्ता, जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना खाण्यासाठी कच्चा कांदाही द्यावा लागतो. तथापि, काहींनी कच्चा कांदा देण्याऐवजी काकडी देणे सुरू केले आहे. तर ग्राहकी टिकून राहावी म्हणून अनेक ठिकाणी कांदा कमी व पात जास्त असेही दिसून येत आहे. एकूणच कांद्याने गृहिणींसोबतच व्यावसायिकांचा वांदा केला असून भाववाढ होत असल्याने डोळ्यात पाणी आणले आहे. यामुळे कांद्याची ग्राहकी कमी झाली आहे. मात्र या भाववाढीचा काहीएक फायदा शेतकर्‍यांना नाही.