शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वान धरणात केवळ ३१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 10:41 IST

Only 31% water storage in Wan Dam : हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर :  अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे. यंदा पावसाळा सुरू होऊन तीन आठवड्याच्या वर कालावधी निघून गेला, तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. आतापर्यंत धरण क्षेत्रात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २९ जून, २०२० रोजी धरणात तब्बल ४१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणातील जलसाठ्यात १० टक्क्यांनी घट झाली. लवकर धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपाणपट्ट्यातील संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्या जलसाठ्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात लवकर समाधानकारक पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यात कपातीची वेळ येऊ शकते. वान नदी पात्रात उभारण्यात आलेल्या हनुमान सागर धरणावर शेकडो गावांतील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे. या धरणावर वीजनिर्मिती संच कार्यान्वित असून, त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलोवॅट आहे. दरवर्षी १ किलोवॅट वीजनिर्मिती येथे करण्यात येते. या वर्षी मात्र धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने वीजनिर्मिती संच बंदच आहे. मध्य प्रदेशातून उगम असलेली वान नदी सातपुडा पर्वत रांगेतून येत असल्याने, या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पाऊस पडल्यास, या धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते. पावसाळा सुरू होऊन बराच कालावधी उलटून गेला,  पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणात पाण्याची आवक घटत आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पSangrampurसंग्रामपूरTelharaतेल्हारा