शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मनुष्याचं ‘मन’हेच खरे दैवत: संतोष तोतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:36 IST

मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : साधु  संतांनी ‘मन जिंकेल...तो जग जिंकेल’ असा उपदेश दिला आहे. संतांचा हा उपदेश प्रत्येकाच्या जीवना तंतोतंत लागू पडतो. ‘चिंतना’मध्येच मनुष्य जीवनाचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला.   जीवन विद्या मिशन शाखा मलकापूर शाखेच्यावतीने सदगुरू वामनराव पै यांच्या संदेशावर आधारीत ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावर दोन दिवसीय प्रवचन माला स्थानिक मुक्तेश्वर आश्रमात आयोजित करण्यात आली. या प्रवचन मालेचे द्वितीय पुष्प गुंफताना संतोष तोतरे रविवारी बोलत होते.   सदगुरू वामनराव पै यांच्या तत्वज्ञानातील ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा धागा धरून आपले विचार व्यक्त करीत उपस्थितांना ओतप्रोत केले. सकारात्मक विचारांचे अनेक दाखले देत त्यांनी सुमारे दीडतास सभागृह अक्षरक्ष: खिळवून ठेवले. सकारात्मक विचार आणि चिंतन हीच माणसाच्या यशस्वी होण्याची खरी गुरूकिल्ली असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अनिष्ट विचार करणारा माणुस कधीही सुखी होवू शकत नाही. त्यामुळे मनुष्याने आपल्या आयुष्यात नकारार्थी विचारांना कोठेही स्थान देता कामा नये, असेही ते शेवटी म्हणाले.  जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतर्मनाची जडणघडण अत्यंत महत्वाची आहे. जीवनविद्येचे विचार आपल्या अंतर्मनात खोलवर रुजले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.खामगाव येथील प्रबोधन महोत्सव यशस्वी करण्यासाठी जीवन विद्या मिशन मलकापूर शाखेचे अशोक अनासने  , डॉ.प्रविण गासे, राहुल कोलते , एम.ए.सुरळकर, अजय आटोळे ,  सचिन मुंढे , अ‍ॅड.जयंत पाटील , अनिल बंड , गणेश माकोडे , चंदु भाटीया आदींनी परीश्रम घेतले.

  अनेकांनी घेतला अनुग्रह!खामगाव येथील मुक्तेश्वर आश्रमात जीवनविद्या मलकापूर शाखेच्यावतीने दोन दिवसीय प्रबोधन महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात रविवारी शेकडो भाविकांनी सदगुरू वामनराव पै यांचा अनुग्रह घेतला. खामगाव येथे नियमित संत्सग सुरू करण्याचाही संकल्प यावेळी काहींनी केला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावAdhyatmikआध्यात्मिक