शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:35 IST

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील उमेदवार इतर जिल्ह्यांसाठी अर्ज करत आहेत. वनरक्षक पदासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची ३ फेब्रुवारी ही अंतीम मुदत असल्याने अर्जासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी उरला आहे. वने हे नैसर्गिक स्त्रोतांचा एक अविभाज्य भाग सजमला जातो. या नैसर्गिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ‘वनरक्षकाच्या’ खांद्यावर असते. त्यामुळे वन विभागात वनरक्षक (गट क) या पदाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. राज्यात वन विभागातील गट क संवर्गातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदे भरण्यात येत असून त्यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ व अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागांचा समावेश आहे. परंतू या पदभरतीमध्ये पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला या तिन्ही जिल्ह्याच्या वाट्याला एकही जागा आली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात भरतीप्रक्रिया सुरू असताना पश्चिम वºहाडातील जिल्हे यामध्ये वगळण्यात आल्याने या जिल्ह्यातील उमेदवारांना इतर ठिकाणी अर्ज करावे लागत आहेत. परिणामी बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेसाठी सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची सुरूवात १४ जानेवारी पासून सुरू झालेली आहे. त्याकरीता उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठल्याही एका विषयात उत्तीर्ण असावा, अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जमाती किंवा माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण व उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतीम मुदत ३ फेब्रुवारी असून अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी उरल्याने विद्यार्थ्यांची सध्या आॅनलाइन संकेतस्थळावर गर्दी होत आहे.

राज्यात उपलब्ध जागा

राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदाच्या जागा आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग २२, सोलापूर दोन, ठाणे १९५, यवतमाळ ६२, पालघर २९, पभरणी तीन, पुणे ३२, रत्नागिरी दोन, सांगली दोन, सांतारा १३, कोल्हापूर ७२, नागपूर २६८, नांदेड ३७, नंदुरबार ७०, नाशिक ५८, उस्मानाबाद १०, चंद्रपूर ८०, धुळे १४६, गडचिरोली १४१, गोंदिया ६८, हिंगोली दोन, जळगाव ३२, अहमदनगर ३०, अमरावती ८०, औरंगाबाद ९५, बीड तीन, भंडारा १९ जागा आहेत.

सर्कल निहाय ह्या जागा आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील एकूण रिक्त पदे विचारात घेऊन ही भरती होत असून यात नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांची अकोला, बुलडाणा, वाशिम कुठेही बदली होऊ शकते.

- संजय माळी, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग